IPL Playoff Scenarios : RCBच्या विजयाने बदलले समीकरण, 3 संघ बाहेर, पण 6 अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत...

IPL 2024 Playoff Scenarios : आयपीएल 2024 मधील प्लेऑफची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. या हंगामात आतापर्यंत 62 सामने खेळले गेले आहेत. पण कोलकाता नाइट रायडर्स वगळता कोणत्याही संघ अजुन प्लेऑफसाठी निश्चित झाला नाही. आताही केकेआर व्यतिरिक्त असे 6 संघ आहेत, जे टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा समावेश आहे.

रविवारी आयपीएलमध्ये दोन सामने खेळल्या गेले. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने राजस्थान रॉयल्सचा तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यांनंतर कोलकाता नाईट रायडर्स 9 सामने जिंकून 18 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तो प्ले ऑफमध्ये खेळणार हे निश्चित आहे. आता त्याची नजर टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यावर आहे.

गुजरातला विजय अनिवार्य! आज कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान; रसेल, गिलकडे लक्ष

चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत होऊनही राजस्थान रॉयल्स संघ 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा रनरेट 0.349 आहे. पराभवाची हॅट्ट्रिक करणाऱ्या आरआरचे अद्याप 2 सामने बाकी आहेत. यापैकी एकही जिंकल्यास ते 18 गुणांसह प्लेऑफमध्ये जातील.

पण जर राजस्थान दोन्ही सामने हरला तर अडचणीत येऊ शकतो. कारण- सध्या चेन्नई, हैदराबाद आणि लखनौचे संघ 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. असे झाल्यास राजस्थान, चेन्नई, हैदराबाद आणि लखनौचे तीनच संघ पुढे होतील. ते तीन संघ कोण असतील हे नेट रन रेट ठरवेल. पण या संपूर्ण समीकरणात राजस्थान रॉयल्ससाठी दिलासा देणारी बाब म्हणजे त्यांचा नेट रन रेट चांगला आहे.

चेन्नई सुपर किंग्जसमोर मोठा पेच आहे. जर त्याने शेवटचा सामना जिंकला तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करेल. जर CSK शेवटचा सामना हरला तर अडचणीत येऊ शकतो. कारण- CSK व्यतिरिक्त, हैदराबादचे सध्या 14 गुण आहेत. चेन्नई पराभूत झाल्यास बेंगळुरूचे (RCB) देखील 14 गुण होतील. दिल्ली आणि लखनौ देखील 14 गुण मिळवू शकतात. म्हणजेच 14 गुणांवर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर नेट रन रेट चांगला असायला हवा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुढील सामना शनिवारी चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. आरसीबीने सलग पाच सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या घरच्या मैदानावर सामोरे जावे लागेल तेव्हा त्याचा वरचष्मा असेल.

प्लेऑफच्या शक्यतेबद्दल बोलताना हा सामना बेंगळुरूसाठी करा किंवा मरो असा आहे. आरसीबी जिंकल्यास 14 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत असेल. जर तो सामना हरला तर त्याचे फक्त 12 गुण राहतील आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply