33 जिल्हा परिषदांमध्ये आम्ही घड्याळावर लढलो, एबी फॉर्मवर सही कुणाची होती? उत्तर द्या… विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांनी घेरले

अजितदादा यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघाती निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र शरद पवार यांच्या गटाकडूनच यासंदर्भात दावा केला जात आहे. अजितदादा पवार यांच्या गटाचे नेते मात्र विलीकरणाच्या मुद्याला बगल देत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाशी बोलताना आपली बाजू मांडत विलीकरणाच्या मुद्यावर आपले मत मांडले आहे.

अमोल कोल्हे यावेळी म्हणाले की अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन २० दिवस झाले तरी चौकशी अहवाल येत नाही हे दुर्दैवी आहे. आमदार रोहित पवार हे काही प्रश्न उपस्थित करीत आहेत, त्यात काही तरी तथ्य असेल ना ? पण सगळी चौकशी ही झालीच पाहिजे.त्यांच्या पक्षातील नेते या विमान अपघाताच्या चौकशीच्या संदर्भात का बोलत नाहीत ? हे त्यांना तुम्ही विचारा असाही प्रति सवाल त्यांनी केला आहे.

विलीनीकरणाच्या संदर्भात ते म्हणाले की, माझ्या शिरूर मतदार संघात ३३ जिल्हापरिषदेच्या जागा, आम्ही घड्याळ चिन्हावर लढलो ना? जेव्हा या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते, त्यावर कोणाची सही होती? त्यांनी बोलावं… ना की विलनीकरण हे होणार होतं की नव्हतं म्हणून.आमची चर्चा ही दादांसोबत होती, त्यामुळे ते आता काय बोलणार ? पण उमेदवारांच्या एबी फॉर्मवर सही मात्र कोणाची होती, हे चेक करा त्यावरून कळेल ना? मग त्यांना माहीती होतं की नव्हतं ? आमच्या पक्षातील माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी आणि अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर लढल्या होत्या. मग यांना कोणी उभं केलं होतं घडाळ्याच्या चिन्हावर? त्यांनी उत्तर द्यावीत ना. यासंदर्भात असाही उलट सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.

अजित पवार आणि माझी भेट ही १८ जानेवारीला हर्षवर्धन पाटील यांच्या घरी झाली होती. आणि आम्ही तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जेवायला बसलो होतो, तेव्हा अजित पवार मला म्हणाले होते की,’ डॉक्टर बेस्ट तुम्ही अजून सुद्धा डाएट पाळत आहात ! दादा आणि माझी तीच शेवटची आठवण आणि भेट होती असेही भावूक होत अमोल कोल्हे म्हणाले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *