
सोलापूर : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. अवघ्या पाच दिवसांत ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असताना शासनाकडून वाढीव मुदतीबाबत कोणतेही आदेश प्रशासनाला प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून गेल्या ४० वर्षांत विविध आवास योजना राबविण्यात आल्या. परंतु या योजना ठराविक वर्गापुरत्याच मर्यादित होत्या. झोपडपट्टीसह मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चार घटकांमध्ये विस्तृत स्वरूपातील सुधारित आवास योजना म्हणून ९ डिसेंबर २०१५ मध्ये संपूर्ण देशात पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आली. ३१ मार्च २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हा या योजनेमागचा मुख्य उद्देश होता. योजनेत पारदर्शीपणा असावा यासाठी याची सर्व प्रक्रिया आनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. कागदपत्रांच्या त्रुटीअभावी अनेकांना त्याचा लाभ घेता आला नाही. घटक एकमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन, पुनर्विकासाचा समावेश आहे. घटक दोनमध्ये बॅंकेतून काढलेले व्याजावरील अनुदान देण्यात येते. तर घटक तीनमध्ये महापालिका सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घरे बिल्डरामार्फत उभी करणार होती आणि घटक चारमध्ये ज्याच्याकडे जागा आहे, त्या कुटुंबांना अडीच लाखाचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते. असे सर्व घटक समावेशक ही योजना होती.
या चारही घटकांपैकी घटक दोनच्या लाभार्थींची संख्या ही सर्वाधिक असून थेट कर्जदार आणि बॅंक यांच्याशी निगडित हा व्यवहार आहे. दरम्यानच्या काळात बिल्डरांनी घरे घेण्यासाठी प्रोत्साहित करताना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गृहकर्जाकरिता बॅंक प्रकरणाची जबाबदारी घेतली. बिल्डर, बॅंक यांच्याशी निगडित विषय असल्याने हजारो कुटुंबांना याचा लाभ मिळाला. घटक १ व ३ ही योजना महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने या योजनेतून एकही इमारत या सात वर्षात उभारली गेली नाही. घटक चारमध्ये कागदपत्रांच्या जाचक अटींमुळे अर्जांची संख्या अत्यल्प आहे. गेल्या सात वर्षांमध्ये २७० कुटुंबांनाच प्रत्यक्ष या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार असून, पंतप्रधान आवास योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.
२७ झोपडपट्ट्यांसाठी डीपीआर तयार
स्वच्छ व स्मार्ट शहर आणि कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहरातील झोपडपट्टीतील कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्की घरे बांधून देण्याची संकल्पना या योजनेची होती. शहरात एकूण घोषित व अघोषित अशा २२० झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये ६० हजार कुटुंबे राहतात. या योजनेंतर्गत ३१ हजार अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. महापालिका व शासन मालकीच्या जागेवर वसलेल्या ५० झोपडपट्ट्यांचा आवास योजनेच्या नियमानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २७ डीपीआर शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
योजनेतील सर्वसमावेशक चार घटक
घटक एक : झोपडपट्टीतील रहिवाशांचे पुनर्वसन, पुनर्विकास घटक दोन : बॅंकेतून गृहकर्जावरील व्याजावर सूटसाठी अनुदान घटक तीन : मध्यमवर्गातील कुटुंबांना परवडणारी घरे घटक चार : ज्या कुटुंबाकडे जागा आहे, त्या कुटुंबाला घर बांधण्यासाठी अडीच लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान
शहरातील संख्या व महापालिकेकडे प्राप्त अर्ज
घटक एकसाठी : ६० हजार कुटुंबे, ३१ हजार अर्ज प्राप्त घटक दोनसाठी : बॅंकेमार्फत साधारण २० हजार लाभार्थींना मिळाला लाभ घटक तीनसाठी : ५७ हजार अर्ज प्राप्त घटक चारसाठी : १५०० अर्ज प्राप्त. ५३५ घरांना अनुदान मंजूर, २७० घरे पूर्ण, ४४ घरांसाठी अनुदानाची प्रक्रिया सुरू
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर