समृद्धी महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महामार्गामुळं कमी होतील. शेतकऱ्यांना या महामार्गाचा फायदा होईल, असा दावा एमएसआरडीसीचे अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे केलाय. सध्या मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी १८ ते २० तास लागतात. समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) हे अंतर आठ तासांमध्ये गाठता येईल, असंही त्यांनी सांगितलं.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांसह समृद्धी महामार्गाची पाहणी केली. कोरोना काळात महामार्गाचे काम मार्गी लावले. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्याचं समाधान असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
महामार्गामुळं वेळ आणि इंधनाची बचत होईलच. याशिवाय हा मार्ग पर्यावरणपूरक असेल. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यावर प्रक्रिया होईल. या भागात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यावर आधारित उद्योगधंदेही येतील. या सर्व गोष्टींचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असा दावाही एकनाथ शिंदेंनी केलाय.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात होतात, त्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्या उपाययोजना आहेत? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग अपघातमुक्त असेल. यासाठी महामार्गावर विशेष प्रणाली असेल. नियमांचे पालन करुन वाहन चालवल्यास अपघात होणार नाही. मी स्वत: या महामार्गावर गाडी चालवलीये. हा चांगला अनुभव होता. १२० च्या पुढं गाडी चालवली तरी काही अडथळे आले नाहीत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

