
शेगाव : शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने आत्महत्या करीत आहेत, तर उद्योजकांचे हजारो कोंटीचे कर्ज माफ केले जात आहे. उद्योजकांना कर्जमाफी मिळत असेल तर शेतकऱ्यांना का नाही, असा सवाल करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आत्महत्येस सरकारचे चुकीचे धोरणच कारणीभूत असल्याची टीका शुक्रवारी केली. शेगाव येथील सभेत त्यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान शेगाव येथील सभेच्या निमित्ताने काँग्रेसने मोठे शक्तिप्रदर्शन केले. या सभेत ‘भारत जोडो’ यात्रेची गरज अधोरेखित करत राहुल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिला. ‘‘शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे. या भागांत सहा महिन्यांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामागची कारणे काय होती, याची उत्तरे कोणत्याही शेतकऱ्याशी चर्चा केली तरी मिळतील. शेतमालाला योग्य भाव नाही. विम्याची रक्कम भरूनही नुकसान भरपाई मिळत नाही. ५० हजार, एक लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात. आमचे एक लाखाचे कर्ज माफ होत नाही, पण उद्योजकांचे शेकडो कोटींचे कर्ज माफ कसे होते, असा सवाल शेतकरीच करीत आहेत’’, असे राहुल गांधी म्हणाले.
‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न याआधीही होते. काँग्रेस राजवटीत आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून एक पॅकेज जाहीर केले. त्यातून त्यांना दिलासा मिळाला. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी मनात आणले तर ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देऊ शकतात. पण, त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका राहुल यांनी केली. दोन दिवसांपासून स्वा. सावरकरांवरील टीकेवरून वादंग निर्माण झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शेगावच्या भाषणात सावरकर यांच्याबाबत भाष्य टाळले. सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
‘‘भारत जोडो यात्रेची गरज काय, असे विरोधक विचारत आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला आहे. त्याविरोधात भारत जोडो यात्रेची गरज आहे. या यात्रेचा उद्देश ‘मन की बात’ करण्याचा नव्हे, तर जनतेचा आवाज ऐकण्याचा, त्यांचे दु:ख समजून घेण्याचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सावरकरांबाबत शिवसेना आणि काँग्रेसची मते वेगवेगळी आहेत. परंतु, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी केला. ‘‘भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रतिसाद आणि प्रेम काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. बिरसा मुंडा हे ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत, असे सांगताना राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील काही पक्ष आणि संघटना नाहक वातावरण तापवत आहेत, असा आरोप रमेश यांनी केला. राहुल यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले होते.
देशातील युवक बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात मोफत शिक्षण मिळत नाही. मुलांचे पालक शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतात. पण, त्यानंतरही मुलांना रोजगार मिळत नाही. युवकांचे स्वप्न पूर्ण न होणारा भारत आम्हाला नको. स्वप्न पूर्ण करणारा भारत आम्हाला हवा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


