राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. राज्यात विरोधी पक्षनेत्याशिवाय सभागृह चालवणे हा लोकशाहीचा अपमान आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला ही बाब शोभा देणारी नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलण्याचे काम सुरु
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका केली. राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतंय आणि राज्याच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, याची फक्त महाराष्ट सरकारला नव्हे तर देशाच्या सरकारलाही याबद्दल लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षाशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जिथे शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेतेपद देण्याचे टाळत आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत, पण तिथूनच त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. कारण विरोधी पक्षनेता नको. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलण्याचे काम सुरु आहे. याला निर्लज्जपणा म्हणतात, अशी टीका संजय राऊतांनी केली.
तुम्ही लोकशाहीपणाने सत्तेवर यायचं, लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं, विधीमंडळ स्थापन करायचं आणि त्या लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला जे स्थान आहे ते टाळून बाकी सर्व उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावण्याचे हे कृत्य आहे. विधानपरिषदेत आणि विधानसभेत जर विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवर चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करले, या भीतीपोटी जर विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, ही जर त्यांची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
राज्यात लोकशाहीची गळचेपी
विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी भास्कर जाधव यांचे नाव देऊन एक कालावधी लोटला आहे. भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकासआघाडीने शिक्कामोर्तब केला आहे. पण भास्कर जाधव नको, हे तुम्ही ठरवणारे कोण? विधान परिषेदत काही निर्णय झाले आहेत, तिथेही त्या पद्धतीने विरोधी पक्षाला ते पद द्यायचे नाही, यासाठी कारस्थान केली जातात. महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉ. आंबेडकरांनी संविधान निर्माण केले, त्या राज्यात लोकशाहीची गळचेपी होत असेल तर त्याची इतिहासात नोंद होईल हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसलेली आहे, त्या व्यक्तीचे जे राजकीय व्यक्तीमत्त्व आहे ते पाहता ते हा निर्णय घेतील का हा पहिला प्रश्न आहे. जर निर्णय घेतला तर काय घेतील ही देखील शंका लोकांना आहे. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते, ती व्यक्ती विधानसभेची अध्यक्ष आहे. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षेत बसून पक्षांतराबद्दल एकदम खोटा आणि भंपक निर्णय देते, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही काय अपेक्षा करणार. त्यामुळे माझं तर कायम म्हणणं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणायला हवा. तुमच्याकडे बहुमत आहे, पण विधानसभा अध्यक्ष ज्यापद्धतीने वागतात त्याला लोकशाहीच्या भाषेत मनमानी आणि झुंडशाही म्हणायला हवं. अशा पद्धतीने विधानसभा किंवा विधीमंडळ चालवले जात नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी सुनावले.
[embedded content]
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

