राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला रवाना झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटासंदर्भातील याचिकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुपारच्या सुमारास फडणवीस हे त्यांच्या मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावरुन विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज दिल्लीमध्ये ते भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. फडणवीस यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द झाली तर भाजपासमोर काय पर्याय आहेत यासंदर्भातील चर्चाही या बैठकीदरम्यान होऊ शकते असं म्हटलं जातंय. सत्ता स्थापनेसंदर्भातील पर्यायांचा न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर आढावा या बैठकींमध्ये घेतला जाऊ शकतो असं या विषायसंदर्भातील जाणकार सांगत आहेत.
महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये भाजपाचा वाटा सर्वात मोठा असून भाजपाचे १०६ आमदारांंच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. या सत्ता स्थापनेमध्ये अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मागील दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीदरम्यान शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव, शिंदे गट आणि शिवसेनेने बदलेला विधानसभेतील गटनेता, मुख्य प्रतोद या विषयांवर दोन्ही बाजूने युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने काही निर्देश देत सुनावणी आठ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय सल्ला मसलत करण्यासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे.
येत्या काही दिवसांमध्ये राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चाही सुरु आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असं बुधावारीच स्पष्ट केलं आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला गेल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
१५ ऑगस्ट रोजी राज्यभरामध्ये स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने राज्यातील जिल्ह्यांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र मंत्रीमंडळची स्थापना न झाल्याने आणि पालक मंत्र्यांची नियुक्ती न करण्यात आल्याने या कार्यक्रमांमध्ये झेंडावंदनासारख्या सामान्य गोष्टींसंदर्भातील संभ्रमही निर्माण होण्याची शक्यात आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर मंत्रीमंडळाची स्थापना आणि पालकमंत्र्यांची नियुक्तीला प्राधान्य दिलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे सल्ला मसलत करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जातंय.
शहर
- Mumbai Water : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २४ तास पाणीपुरवठा बंद, पाहा कोणत्या भागांना बसणार फटका
- KEM Hospital : मांडीवर अन् पाठीवर हात टाकला, वरिष्ठ डॉक्टरावर ६ महिला डॉक्टरांचा विनयभंगाचा आरोप
- Mumbai Local : केबल चोरली, लोकल थांबली! कसारा ते कल्याण वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल, एक्स्प्रेसही रखडल्या
- Today Weather Update : नागरिकांनो काळजी घ्या! आज सूर्यदेव आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट
महाराष्ट्र
- Raigad News: श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू, २ सख्ख्या भावांनी गमावला जीव
- Amravati Crime : 'तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन' ६२ वर्षीय पोस्टमॅनकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- Supriya Sule : 'तो अहवाल जाळून टाका'; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया
- Gold-Silver Price Hike: सोनं-चांदीला पुन्हा लखाखी! ६ दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांची वाढ, चांदीही महागली
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे