मुंबई, ठाण्यात कोकण भवन उभरण्यात यावं; नितेश राणेंची मागणी

मंत्री नितेश राणे यांनी मुंबईसह ठाण्यातही कोकण भवन उभारण्याची मागणी केली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात मोठ्या संख्येने कोकणवासीय राहत असल्याने त्यांच्यासाठी हक्काची वास्तू असावी, असे राणेंनी म्हटले. मुंबईच्या महापौरांकडे त्यांनी मागणी केली असून, ठाण्यातील महापौर आणि आयुक्तांनाही याबाबत लवकरच पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, बोरीवलीतील देविदास रोडवरील दीर्घकाळापासून बंद असलेल्या हाय मास्ट पोलच्या दिव्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याविरोधात मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नाकाशे यांनी हा पोल विकणे आहे अशा आशयाचा बॅनर लावून मनसे स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.

याशिवाय, व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या दुर्घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री केंद्रीय गृह विभागाला या संदर्भात पत्र पाठवून सीबीआय चौकशीच्या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे निश्चित झाले आहे. व्हीएसआर कंपनीच्या कारभाराची चौकशी लवकरच अपेक्षित आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *