मुंबईच्या महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई महानगरपालिकेत बोगस जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार किरीट सोमय्या यांनी सादर केलेल्या पुराव्यांमधून २३७ बोगस जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यातील अनेक प्रमाणपत्रे अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती आणि रुग्णालयांच्या नावावर दिली गेली होती.

या प्रकरणी अनेक मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ (एमओएच) आणि डॉक्टरांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आहे. डॉ. अश्रफ काझी नावाच्या एका व्यक्तीने, प्रसूत महिलेच्या ठिकाणी उपस्थित नसतानाही, जन्म प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. किरीट सोमय्या यांनी यासंबंधीचे पुरावे आरोग्य अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिले असले, तरी अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही.

महापौर तावडे यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांच्या जन्म प्रमाणपत्रांची कठोरपणे चौकशी करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची माफी दिली जाणार नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *