प्रो. चेतन सिंग सोलंकी यांचा कॉलम:समृद्धीचे अमृत तर मिळाले, पण प्रदूषणाचे विष कोण पिणार?‎

‎‎‎‎‎‎‎‎पौराणिक कथांनुसार, जेव्हा देव आणि असुर यांनी ‎अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले होते, तेव्हा‎ अमृतापूर्वी ‘हलाहल’ नावाचे भयंकर विष बाहेर आले होते.‎त्या विषामुळे संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचे संकट उभे राहिले ‎होते. तेव्हा भगवान शिव यांनी करुणे पोटी ते विष आपल्या ‎कंठात धारण केले आणि ते नीलकंठ म्हणवले गेले.‎ आजच्या युगात आपण पुन्हा एकदा मंथन करत आहोत.‎ हे मंथन आहे निसर्गाच्या संसाधनांचे. आपण आपल्या‎सुख-सुविधा आणि अंतहीन इच्छांच्या पूर्तीसाठी पृथ्वीच्या ‎गर्भापासून आकाशापर्यंत, प्रत्येक नैसर्गिक संसाधन घुसळून ‎काढत आहोत. यातून आपल्याला आर्थिक समृद्धी आणि‎ तंत्रज्ञानाचे अमृत तर मिळत आहे, पण त्यासोबतच‎ प्रदूषणाचे विषही बाहेर पडत आहे. विकासाच्या आपल्या‎या आंधळ्या शर्यतीने केवळ हवा विषारी आणि पाणी‎प्रदूषित केले नाही, तर मातीलाही मोठ्या प्रमाणावर नापीक ‎बनवले आहे. पृथ्वीचे वाढते तापमान आणि अनियंत्रित ‎हवामान बदल आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका ‎बनले आहेत. विडंबना अशी आहे की, आपण नैसर्गिक‎ संसाधनांचे इतक्या निर्दयीपणे आणि वेगाने मंथन करत‎ आहोत की निसर्गाला स्वतःला सावरण्याची आणि‎ पुनरुज्जीवित करण्याची संधीच मिळत नाही.‎ आज मानवता पृथ्वीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने‎ अधिक उपभोग घेत आहे. हा अतिरिक्त उपभोग म्हणजेच ते‎विष आहे, जे पर्यावरणात कार्बन उत्सर्जन आणि‎ कचऱ्याच्या रूपात विरघळत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न‎हा आहे की, आजच्या काळातील हे विष पिणार कोण? ‎आपण एखाद्या चमत्काराची प्रतीक्षा करायची का, की‎ कोणीतरी येईल आणि आपण पसरवलेले हे प्रदूषण शोषून ‎घेईल? विज्ञान आणि तंत्रज्ञानाला स्वतःच्या मर्यादा आहेत.‎जोपर्यंत आपण पृथ्वीच्या मर्यादेत राहून जगणार नाही आणि ‎विष निर्माण करणे बंद करणार नाही, तोपर्यंत कोणतेही‎ तंत्रज्ञान किंवा धोरण यशस्वी होऊ शकत नाही.‎ आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या वाट्याचे थोडे थोडे ‎हलाहल प्यावे लागेल. हे विष कोणत्याही पेल्यात नसून‎ आपल्या जीवनशैलीत आहे. आपल्याला अधिक ‎मिळवण्याची आपली लालसा आपल्या कंठातच रोखून ‎धरावी लागेल, जेणेकरून ती पृथ्वीच्या खोलवर पोहोचणार ‎नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या जबाबदारीचे हे विष पेईल,‎तेव्हाच येणाऱ्या पिढ्यांसाठी अमृत सुरक्षित राहील.‎ आपल्याला हे मान्य करावे लागेल की, पृथ्वी मर्यादित ‎आहे आणि ती नेहमीच मर्यादित राहील, मग आपले विज्ञान‎ आणि आपली अर्थव्यवस्था कितीही प्रगती करो. वास्तवात,‎संसाधनांची कमतरता समजून घेणे मानवासाठी अत्यंत‎सहज आणि स्वाभाविक आहे. जेव्हा आपले उत्पन्न ‎मर्यादित असते, तेव्हा आपण आपले खर्च आपोआपच ‎मर्यादित करतो. जर आपल्याकडे ५ आसनी कार असेल, तर ‎आपण त्यात दहा लोकांना बसण्यासाठी आमंत्रित करत‎ नाही. आपण दररोज क्षमतेच्या आधारावर निर्णय घेतो, मग‎ पृथ्वीच्या संदर्भात आपण हे मूलभूत सत्य का विसरतो?‎ पृथ्वीचा आकार निश्चित आहे आणि तो काळानुसार किंवा‎ तंत्रज्ञानानुसार वाढत नाही. तिची संसाधनेही मर्यादित‎ आहेत. आपला उपभोग आणि मागणी सातत्याने वाढत‎ चालली आहे आपण एका मर्यादित पृथ्वीवर राहत आहोत‎ ही जाणीव होणे, हा समाधानाच्या दिशेने टाकलेले पहिले ‎पाऊल आहे. जेव्हा आपण आपल्या मर्यादा ओळखू,‎ तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने निवारणाकडे वाटचाल करू‎ शकू. येथे हे समजून घेणे देखील अनिवार्य आहे की, ही‎ समस्या आपल्या सर्वांच्या उपभोग घेण्यामुळेच निर्माण‎ झाली आहे, म्हणूनच समाधानाचा भागही आपल्या‎ सर्वांनाच व्हावे लागेल. आपण आपल्या सवयी सुधारल्या‎ आणि एखादी गोष्ट ‘परवडण्याची’ क्षमता असूनही ‎निसर्गासाठी ती ‘टाळणे’ शिकलो, तर आपण या विषाचा ‎प्रसार रोखू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *