प्रियदर्शन यांचा कॉलम:इंटरनेटने आपली स्मृती हिरावली होती, एआयने कल्पनाशक्ती हिरावू नये‎

‎‎‎‎‎‎‎‎एआयबाबतचा आपला उत्साह किती वैज्ञानिक आहे‎आणि किती उपभोक्तावादी? एआयमुळे निर्माण होणाऱ्या‎वास्तविक शक्यता किंवा आव्हानांबाबत आपण जागरूक‎आहोत का? की आपण त्याला फक्त वापरात येणारी अशी‎गोष्ट समजत आहोत, ज्यामुळे आपली बरीचशी कामे‎सोपी होतील? किंवा असा धोका ज्यामुळे अनेक नोकऱ्या‎जातील? किंवा ज्यामुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील?‎ दिल्लीत नुकत्याच संपन्न झालेल्या ‘एआय समिट’‎दरम्यान जी चर्चा झाली, त्यातून साधारणपणे याच सर्व‎गोष्टी समोर येत राहिल्या. एआय आपल्यासाठी शेती सोपी‎करेल, व्यापार सोपा करेल, उपचार सोपे करेल, काही‎नोकऱ्या संपवेल तर नवीन नोकऱ्या निर्माण करेल. या‎चर्चेत या उपभोक्तावादी समजुतीसोबतच ही घोषणाही‎जोडलेली होती की, भारत येणाऱ्या वर्षांत एआय क्रांतीच्या‎मागे चालणार नाही, तर तिला आकार देईल.‎ यात शंका नाही की, एआय हे एका अशा क्रांतीचे‎आगमन आहे, ज्याच्या वास्तविक परिणामांपासून आपण‎अद्याप अनभिज्ञ आहोत. जाणकार याला औद्योगिक‎क्रांतीपेक्षा मोठी क्रांती मानताहेत, ज्यानंतर जग बदलून गेले‎होते. युवल नोआ हरारी यांनी आपल्या “नेक्सस” या‎पुस्तकात याच्या धोक्यांपासून सावध केले आहे. त्यांच्या‎मते, एआय माहितीचा अणुबॉम्ब ठरेल. त्याहून मोठी चिंता‎ही आहे की, मानवी संस्कृतीसमोर पहिल्यांदाच असे यंत्र‎आहे, जे स्वतः निर्णय घेऊ शकते. लष्करी उपक्रम किंवा‎अणु मोहिमांमध्ये याचा वापर धोकादायक ठरू शकतो.‎एआयमुळे माहिती ग्रहण करण्याची आपली क्षमता,‎संवेदना वाहून नेण्याचा आपला सराव यात बरेच काही‎बदलू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यासाठी‎कविता-कादंबरीही लिहून देईल आणि टीव्ही मालिकाही‎बनवून देईल. या दृष्टीने या नवीन प्रयोगासमोर आपल्याला‎काही प्रमाणात सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे.‎पण आपण वातावरण असे काही बनवून ठेवले आहे की,‎आपण ही एआय क्रांती प्रत्येक ठिकाणी अमलात आणू -‎मग ते शिक्षण, आरोग्य असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र.‎शाळा-कॉलेजांमध्ये शिकवण्यासाठी नवनवीन एआय‎मॉडेल्स सादर केली जात आहेत, पण एआय जर मुलांना‎शिकवेल, तर त्यांचा नैसर्गिक विकास होऊ शकेल का?‎ स्लेट किंवा वहीवर रेषा ओढणे, आकार बनवणे, अक्षरे‎शिकणे, वाक्ये तयार करणे इत्यादी जी प्रक्रिया असते,‎ज्यामध्ये बोटांत धरलेली पेन्सिल किंवा लेखणी सहायक‎असते आणि ज्यामध्ये अनेकदा स्वतःचे‎लिहिलेले-रचलेले पुसण्याची किंवा काटण्याची गरजही‎भासते, ते वास्तविक शिक्षण आहे. हे केवळ शब्दज्ञान‎नाही किंवा इतिहास-भूगोल, गणित-विज्ञानाचा असा धडा‎नाही जो एआयने शिकवावा आणि तो घेऊन मुलांनी‎जीवनाच्या मैदानात उतरावे. वही-पेन्सिल-रबरने‎घासून-घासून संयमाने सर्व काही शिकणारी मुले‎चिकाटीने शिकतात, ती जीवनातील चढ-उतार आणि‎नवनिर्मिती सहजपणे हाताळू शकतात, पण एआयच्या‎कोरीव ज्ञानातून बाहेर पडलेली मुले तितकीच यांत्रिक असू‎शकतात, जितके कृत्रिम बुद्धिमत्तेचे मॉडेल.‎ नक्कीच, तंत्रज्ञानाला घाबरण्याची गरज नाही - हे‎इतिहासाने सांगितले आहे. मात्र, माझ्यासारख्या लोकांची‎काळजी ही आहे की इंटरनेटने आपली स्मृती हिरावून‎घेतली, आता एआय आपली कल्पनाशक्ती हिरावून न‎नेवो. आता आपण काहीही लक्षात ठेवत नाही, सर्व काही‎नेटवर शोधतो - आप्तस्वकीयांची नावे-पत्ते-नंबर आणि‎त्यांच्या घरापर्यंत नेणारे रस्ते सुद्धा. तंत्रज्ञानाचे पुढचे‎आक्रमण आपल्या कल्पनाशक्तीवर होणार आहे, कारण‎आपण सर्व चित्रे, सर्व नकाशे, सर्व कलात्मक वस्तू‎एआयकडून बनवून घेण्याची कल्पना करत आहोत.‎एआयचे आगमन हे एक वास्तव आहे. या जगात वैज्ञानिक‎पद्धतीने उतरलो, तरच खऱ्या अर्थाने एआय क्रांतीला‎आकार देण्यात काही योगदान देऊ शकू, पण जर व्यापारी‎किंवा सजावटीच्या-दिखाऊ पद्धतीने विचार केला, तर‎मात्र हसे करून घेऊ.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

1 thought on “प्रियदर्शन यांचा कॉलम:इंटरनेटने आपली स्मृती हिरावली होती, एआयने कल्पनाशक्ती हिरावू नये‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *