पुणे : मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत उर्वरित राज्यामध्ये तुरळक भागातच हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी जुलै महिन्यातील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडणार आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्रातील पाऊस सर्वसाधारण राहण्याचे स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुंबईत २८, तर सांताक्रुझ केंद्रावर ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अलिबागला ८७, तर डहाणूमध्ये ६४ मिलिमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात पुणे, महाबळेश्वर आणि विदर्भातील वर्धा जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये चार दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या उर्वरित भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
पर्जन्यभान..
गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबई विभाग आणि कोकणात जोरदार पाऊस झाला. कुलाबा केंद्रावर चोवीस तासांत २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महालक्ष्मी विभाग १८०, तर गुहागर, मालवण आणि राजापूरमध्ये १४० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. अलिबाग, रत्नागिरी, मुरूड, उरण, वसई आदी भागांत १०० मिलिमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, लोणावळा, महाबळेश्वरमध्ये ५० ते ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कारण काय?
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणच्या किनारपट्टीच्या भागात गुजरातपासून कर्नाटकपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले असल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रातून भूभागाकडे बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातही पावसाला सुरुवात झाली आहे.
कोकणात अतिवृष्टीचा इशारा..
कोकण विभागात पुढील चार ते पाच दिवस पाऊस कायम राहणार आहे. दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४ आणि ५ जुलैला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या महिन्यात काय?
जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असल्याने अनेक भागांत पाण्याबाबत चिंता आहे. सध्या मुंबईसह कोकण विभागात पाऊस होत असला, तरी उर्वरित भागांत पाऊस कमी आहे. त्यामुळे जुलैमधील पावसाकडे डोळे लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जुलैमधील देशातील पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार या महिन्यात कोकण विभागात सर्वसाधारण पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पाऊस सरासरी गाठणार आहे. मात्र, विदर्भात सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि बदलापूर शहरासह ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ठाणे शहरात काही भागात वृक्ष उन्मळून पडले. तर एका इमारतीचा सज्जा कोसळण्याबरोबरच संरक्षक िभत पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये कुणीही जखमी झाले नाही.
जोरदार पावसामुळे ठाणे शहरातील तलावपाली, वदंना सिनेमागृह, तीन पेट्रोल पंप, घंटाळी रोडसह मुंब्रा तसेच दिव्यातील काही भागात पाणी साचले होते. पाचपाखाडी येथील भक्ती मंदिर, लुईसवाडी, ब्रम्हांड येथील स्वस्तिक पार्क, कासारवडवली गाव, मनोरुग्णालय परिसर अशा अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. पाचपाखाडी, कामगार रुग्णालय परिसरात तीन वृक्ष उन्मळून पडले. भिवंडी, कल्याण-बदलापूर भागातील मुख्य मार्गावर पाणी साचले होते. काल्हेर-कशेळी मार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत भाग, कल्याण- बदलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं