पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा

अजित पवार हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते एका पिढीचा आत्मविश्वास होते, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शेतीची सखोल माहिती असलेले आणि मातीतून तयार झालेले नेतृत्व म्हणून दादांची ओळख होती. त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष आले, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रसंगी जाहीर माफी मागण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

2019 च्या शपथविधीबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, अजित पवार पहाटेचा शपथविधी या नावाला आक्षेप घेत असत. पहाट म्हणजे सकाळी सहा असते, तर आम्ही नऊ वाजता शपथ घेतली, तो सकाळचा शपथविधी होता, असे ते म्हणत. दादा त्यांच्या शब्दावर ठाम राहिले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर, वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून दादांनी आपला निर्णय बदलला. अजित पवारांच्या स्वभावात पारदर्शकता होती. ते जे मनात होते तेच बोलून दाखवत, राजकीय परिणामांची फारशी काळजी करत नसत. त्यांचा वक्तशीरपणा आणि मंत्रालयात सकाळी नऊ वाजता हजर राहण्याची सवय उल्लेखनीय होती. यामुळे मंत्रालयाचे कामकाज कधीही थांबले नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *