पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मुलांच्या मित्रांची माहिती आपल्याला असायला हवी

जसे काही संकेतस्थळांवर (साइट्स) जाण्यापासून रोखण्यासाठी ‘गेट व्हॉल्व्ह’ असतात तसेच आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे की त्यांनी कुसंगतीसाठी ‘गेट व्हॉल्व्ह’ तयार करावेत. पूर्वी असे मानले जात असे की मुले जेव्हा तरुण वयात येतील तेव्हा त्यांची मैत्री कुसंगतीत बदलू नये याची काळजी घेतली जावी. परंतु हा धोका आता बालपणापासूनच सुरू झाला आहे. वाकड्या चालीच्या मुलांपासून सरळमार्गी मुलांना वाचवले पाहिजे. पालकांनी मुलांच्या मित्रांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यावी. याचा एक चांगला प्रयोग भगवान शंकरांनी केला होता. वक्र चंद्राला त्यांनी आपल्या मस्तकावर स्थान दिले. ते म्हणाले होते की चंद्राला श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्या नावाशी जोडले आहे. म्हणूनच मी त्याला मस्तकावर धारण करून सन्मान दिला. एखाद्याची पार्श्वभूमी जाणून घेऊन त्याचा सदुपयोग कसा करावा हे शिवजी शिकवत आहेत. आपल्या मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांच्या मित्रांच्या वर्तमानाची आणि भूतकाळाची संपूर्ण माहिती ठेवा.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *