पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:चारित्र्य मजबूत असेल तर ‎ईश्वरीय शक्तीही सोबत असते‎

कोणावर तरी कलंक लावणे हे आजकाल एका व्यवसायासारखे झाले‎आहे. जेव्हा एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, तेव्हा ‎त्यातील सत्य शोधणे मोठे कठीण असते. जगात जेवढी कामे सोपी‎ आहेत, त्यामध्ये सर्वात सोपे काम म्हणजे कोणाचे तरी चारित्र्यहनन‎ करणे. तुम्ही एखाद्याच्या चारित्रावर शिंतोडे उडवले तर तुमचे काहीच‎ जाणार नाही, पण समोरच्याचे आयुष्य मात्र तो डाग धुता धुता निघून‎ जाईल. दोन व्यक्तींवर कलंक लागला होता आणि त्यांनी त्याचे ‎निवारणही अतिशय उत्तमरीत्या केले. श्रीकृष्णावर स्यमंतक मणीमुळे‎ चोर आणि खुनी असल्याचा कलंक लागला होता. भरतावर सत्तेच्या ‎षडयंत्राचा कलंक लागला होता. या दोघांनीही अत्यंत धैर्याने आणि ‎विवेकाने तो कलंक पुसून टाकला. आज ज्या लोकांच्या चारित्र्यावर‎ शिंतोडे उडवले जातात, जर त्यांचे चरित्र मजबूत असेल तर त्यांचा ‎विजय नक्कीच होईल, कारण ईश्वरीय शक्ती त्यांच्या पाठीशी असते.‎ म्हणूनच समाजात असे चित्र पाहायला मिळते की, जेव्हा उंच इमारत ‎हलवणे कठीण असते, तेव्हा काही लोक फक्त तिच्या काचा फोडतात.‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *