
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर आता अमरावतीतही कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. “एकरी २० क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करून शेवटी हरलो. मला एकरी ५किंटलपेक्षा जास्त सोयाबीनचं उत्पादन घेता आलं नाही,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. तसेच “हे उत्पादन कसं वाढवायचं हे आम्हाला सांगा, अन्यथा सहावं-सातवं वेतन देऊन काय करायचं? बाप दाखव, नाहीतर श्राद्ध करा,” असंही नमूद केलं. ते अमरावतीत अपेडा आणि अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, “एकरी २० क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे. मी प्रयत्न करून हरलो, मला ५ क्विंटलच्या वर जाता आलं नाही. एकरी २० क्विंटल कापूस झाला पाहिजे. हे करणार असेल तर तुमचा उपयोग आहे, नाहीतर सहावं-सातवं वेतन देऊन आम्ही काय करायचं? ‘बाप दाखवा, नाहीतर श्राद्ध करा’. हे उत्पादन कसं वाढवायचं हे आम्हाला सांगा.”
नितीन गडकरी सोमवारी (१८ जुलै) अमरावती दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान त्यांनी अपेडा आणि अॅग्रोव्हिजन फाउंडेशनने आयोजित केलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावली. यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक आणि जैविक शेतीकडे वळणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे. यातून एकमेकांना साहाय्य करणे गरजेचे आहे. असं केलं तरच यशस्वी शेतकरी बनू शकता असा सल्ला गडकरींना दिला. यावेळी नितीन गडकरींनी एकरी १०२ टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं देखील कौतुक केलं. शेती करताना उत्पादन खर्च कमी करणे, उत्तम पॅकेजिंग करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्रात मार्गदर्शन घेऊनच शेती करणे उत्तम ठरू शकते, असं त्यांनी नमूद केलं.
शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करणे गरजेचे आहे. यातून चांगलं उत्पादन देखील होऊ शकतं. त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही. मराठवाड्यासारखी फळे, भाजीपाला उत्पादन देखील विदर्भात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. याला केवळ शेतकऱ्यांनी मार्गदर्शन आणि मेहनतीची गरज आहे, असे झाल्यास विदर्भ देखील मागास राहणार नाही आणि भारत देश शेतीत प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी आधुनिक शेतीवर बोलताना म्हणाले, “आता आपल्याला शेती अशी करायची आहे की प्रथम क्रमांकावर शेती राहिली पाहिजे, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी आली पाहिजे. तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे उत्पादन वाढवणं, खर्च कमी करणं, जागतिक बाजारपेठेत जाऊन उत्पन्न वाढवता येतं.”
“विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत, तर आपली संत्री का जात नाहीत? कशामुळे आपण मागे का आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, “तुम्ही जर चांगलं उत्पादन काढलं, चांगलं पॅकिंग केलं तर उत्पन्न वाढेल. तुम्हालाच हे करायचं आहे. एकतर परमेश्वर किंवा सरकार असं व्हायला नको. देवाने दिलं, देवाने नेलं असं जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरूर पाहिजे, पण देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार?”
“तुम्हाला देखील काही पुढाकार घ्यावा लागतो. हे उदाहरण लोकांना जास्त चांगलं समजतं. त्यामुळे तुम्हीच तुमच्या या प्रयत्नातून हे यशस्वी करा. माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नका. तुम्ही प्रयत्न केला, तर नक्की यात यश मिळेल,” असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


