केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर आता अमरावतीतही कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. “एकरी २० क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करून शेवटी हरलो. मला एकरी ५किंटलपेक्षा जास्त सोयाबीनचं उत्पादन घेता आलं नाही,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. तसेच “हे उत्पादन कसं वाढवायचं हे आम्हाला सांगा, अन्यथा सहावं-सातवं वेतन देऊन काय करायचं? बाप दाखव, नाहीतर श्राद्ध करा,” असंही नमूद केलं. ते अमरावतीत अपेडा आणि अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, “एकरी २० क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे. मी प्रयत्न करून हरलो, मला ५ क्विंटलच्या वर जाता आलं नाही. एकरी २० क्विंटल कापूस झाला पाहिजे. हे करणार असेल तर तुमचा उपयोग आहे, नाहीतर सहावं-सातवं वेतन देऊन आम्ही काय करायचं? ‘बाप दाखवा, नाहीतर श्राद्ध करा’. हे उत्पादन कसं वाढवायचं हे आम्हाला सांगा.”
नितीन गडकरी सोमवारी (१८ जुलै) अमरावती दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान त्यांनी अपेडा आणि अॅग्रोव्हिजन फाउंडेशनने आयोजित केलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावली. यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक आणि जैविक शेतीकडे वळणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे. यातून एकमेकांना साहाय्य करणे गरजेचे आहे. असं केलं तरच यशस्वी शेतकरी बनू शकता असा सल्ला गडकरींना दिला. यावेळी नितीन गडकरींनी एकरी १०२ टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं देखील कौतुक केलं. शेती करताना उत्पादन खर्च कमी करणे, उत्तम पॅकेजिंग करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्रात मार्गदर्शन घेऊनच शेती करणे उत्तम ठरू शकते, असं त्यांनी नमूद केलं.
शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करणे गरजेचे आहे. यातून चांगलं उत्पादन देखील होऊ शकतं. त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही. मराठवाड्यासारखी फळे, भाजीपाला उत्पादन देखील विदर्भात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. याला केवळ शेतकऱ्यांनी मार्गदर्शन आणि मेहनतीची गरज आहे, असे झाल्यास विदर्भ देखील मागास राहणार नाही आणि भारत देश शेतीत प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी आधुनिक शेतीवर बोलताना म्हणाले, “आता आपल्याला शेती अशी करायची आहे की प्रथम क्रमांकावर शेती राहिली पाहिजे, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी आली पाहिजे. तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे उत्पादन वाढवणं, खर्च कमी करणं, जागतिक बाजारपेठेत जाऊन उत्पन्न वाढवता येतं.”
“विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत, तर आपली संत्री का जात नाहीत? कशामुळे आपण मागे का आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, “तुम्ही जर चांगलं उत्पादन काढलं, चांगलं पॅकिंग केलं तर उत्पन्न वाढेल. तुम्हालाच हे करायचं आहे. एकतर परमेश्वर किंवा सरकार असं व्हायला नको. देवाने दिलं, देवाने नेलं असं जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरूर पाहिजे, पण देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार?”
“तुम्हाला देखील काही पुढाकार घ्यावा लागतो. हे उदाहरण लोकांना जास्त चांगलं समजतं. त्यामुळे तुम्हीच तुमच्या या प्रयत्नातून हे यशस्वी करा. माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नका. तुम्ही प्रयत्न केला, तर नक्की यात यश मिळेल,” असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा