ट्रम्प आणि टेरिफ. जग हैराण आहे. भारतही. मुद्दा असाआहे की आजकाल अमेरिका जगात आपले वर्चस्वप्रस्थापित करू इच्छिते. खरे तर ते तसे करत आहेत. 1919 ते 1939 पर्यंत जगात ब्रिटन एक महासत्ता होती. परंतुविनासंघर्ष नाही. त्याच्या बाजूला फ्रान्स, जर्मनी, इटली,सोव्हिएत युनियन होते. ग्लास्तनोस्तने सोव्हिएत संघालासोलून काढले. त्यात सोव्हिएत राज्ये तुकडे-तुकडे झाले.ते आपापसात लढत राहिले. आजही युद्धे सुरू आहेत.आज अमेरिका आहे. इतर कुणीही नाही. म्हणूनच ट्रम्पजगावर मनमानीपणा लादू इच्छितात. एकेकाळी जपानने मंचुरिया तर इटलीने अॅबिसिनियावरआक्रमण केले आणि जर्मनीने ऑस्ट्रिया आणिचेकोस्लोवाकियावर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते.त्याचप्रमाणे ट्रम्पदेखील जगावर मनमानी कर लादतीलआणि शीतयुद्धादरम्यान अनेकदा असहाय असलेलेसंयुक्त राष्ट्र जुन्या राष्ट्रसंघाप्रमाणे संघर्ष करत राहील,असे ट्रम्प यांना वाटते. भारतातही या मुद्द्यावर विविध विधाने, आरोप- प्रत्यारोपकेले जात आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षदोघेही एकमेकांवर आक्रमक आहेत. भारतात गुरू गोरखनाथ आणि त्यांच्या योगींबद्दल अनेक कथा आहेत. गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर एकेकाळी दाट झाडींनी व्यापलेले होते. एक कथा अशी आहे की एका नेपाळी सौंदर्यवतीने गुरू गोरखनाथांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. तिला माहीत होते की योगी फक्त खिचडी खातात.तिने पक्वानांप्रमाणेच खिचडीचे पान मांडले. दूर बसलेल्या गुरू गोरखनाथांना त्या महिलेच्या मनात काहीतरी गडबड जाणवली. ते गोरखपूरजवळील दाट झाडीत ध्यानस्थबसले. सुंदरी त्यांची प्रतीक्षा करून कंटाळली. ती दररोज खिचडी शिजवायची आणि वाढायची... पण गोरख आले नाहीत. दगडाच्या चुलीवर खिचडी बनवताना ती स्वतःजणू दगडासारखीच होऊन गेली. पण गोरख कधीचआले नाहीत. सुंदरीचे अपार दुःख त्या दगडांमधून गरम पाण्याच्या झऱ्याद्वारे वाहू लागले. तेथे आजही खिचडीचेभांडे शिजवले जाते. भारतातही सत्तासुंदरी खिचडी शिजवत आहे किंवाखिचडी सत्तेसाठी शिजवली जात आहे, असेही म्हणता येईल. काँग्रेस म्हणत आहे की ट्रम्प यांच्या दबावाखाली पंतप्रधान मोदींनी भारतातील शेतकऱ्यांना गहाण ठेवले आहे. त्यांनीजवळपास सगळा डेटा शेअर केला आहे. ही फसवणूकआहे. धूर्तता आहे. पण काँग्रेसच्या दाव्याला कुणीही महत्त्वदेत नाही. वास्तविक काँग्रेसला आधीच इतकीनकारात्मक प्रसिद्धी मिळाली आहे की लोक ते ऐकायलातयार नाहीत. एक काळ असा होता की काँग्रेसकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक शेताच्या मातीतखोलवर रुजली आहे, असे तेव्हा म्हटले जाई. आता असेदिसते की काँग्रेसला त्याच शेतांच्या मातीने गिळंकृत केलेआहे. हा काळाचा महिमा आहे! कदाचित काँग्रेसचेहीनशीब पालटेल! कारण काँग्रेसला एकेकाळी फीनिक्सवंशाचा पक्ष म्हटले जात असे. फीनिक्स हा प्रत्यक्षात एकपौराणिक पक्षी आहे. तो स्वतःच्या राखेतून पुनर्जन्म घेतो.असे म्हटले जाते की फीनिक्स हा एक महाकाय पक्षीआहे. त्याची चोच लांब, त्यात लहान छिद्रे आहेत.आयुष्य संपत आले आहे असे त्याला वाटते तेव्हा तोसूर्याच्या दिशेने झेपावतो आणि भस्म होतो. काहीकथांनुसार हा पक्षी वृद्धत्वाचा टप्पा गाठतो तेव्हा तो काहीलाकडे गोळा करतो. त्याच्या ढिगाऱ्यावर बसून सुंदर सूरआळवतो. त्या क्षणी चोचीतील छिद्रांमधून ठिणग्या उठूलागतात. त्या वेळी हा पक्षी बसलेला लाकडाचा ढिगाराहीपेट घेतो. पक्षी आगीत जळून राख होतो. स्वाती नक्षत्राच्यावेळी पावसाचे थेंब त्या राखेच्या ढिगाऱ्यावर पडतात तेव्हाएक नवीन फीनिक्स जन्माला येतो. कथेचे सार असे की प्रत्येक जीव, स्वतःच्या संघर्षाच्याआगीत तावून-सुलाखून निघाल्यावर याच राखेतूनफीनिक्ससारखा पुनर्जन्म घेतो. त्यामुळे काँग्रेस पक्षदेखीलफीनिक्स वंशाचा आहे, असे गृहीत धरता येईल. हा मुद्दाअलाहिदा की राजकीय क्षितिजावर अशाी शक्यता सध्यातरी दिसत नाही. आता विरोधी पक्षही सामूहिक प्रयत्नगरजेचे आहेत, असे म्हणू लागले आहेत. नेत्याचा चेहरानिरर्थक आहे. अखिलेश यादव यांचे विधान कदाचितराहुल गांधींच्या नेतृत्वाचा संदर्भ देणारे असावे. आगीतून निघाल्यावर...संघर्षाच्या आगीत भडकल्यानंतरस्वतःच्याच राखेतून पुनर्जन्म घेणाराप्रत्येक जीव फीनिक्स पक्ष्यासारखाअसतो. म्हणूनच काँग्रेसही फीनिक्सवंशातील आहे, असे मानले जाऊ शकते.कमीत कमी अशा प्रकारची अपेक्षा तरीकरता येऊ शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

