औरंगाबाद : बॅंकेकडून २५० कोटींचे कर्ज मंजूर झाल्यानंतर महापालिकेने यातून १५० कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी अभियानासाठी स्वहिस्सा म्हणून भरला आहे. यापूर्वी महापालिकेने ६८ कोटी रुपये भरले होते. हे पैसे परत घेऊन एकदम १०० कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात भरले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात पाच वर्षांत एक हजार कोटींची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात केंद्र शासनाचा ५०० कोटी तर राज्य व महापालिकेचा प्रत्येकी २५० कोटींचा वाटा आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २९४ कोटी, राज्य सरकारने १४७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
महापालिकेने ६८ कोटी रुपयांचा स्वहिस्सा भरला होता. दरम्यान महापालिकेने स्वहिस्सा भरल्याशिवाय पुढील निधी वितरित केला जाणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली होती. तसेच स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या निविदा ३१ मार्च पूर्वी अंतिम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेतर्फे काही महिन्यांपासून स्वहिश्शाचा निधी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान राज्य शासनाच्या मंजुरीने राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून २५० कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेने घेतले आहे. या कर्जाच्या रकमेतून १५० कोटी रुपये स्मार्ट सिटीमध्ये भरण्यात आले. उर्वरित शंभर कोटींचा निधी लवकरच भरला जाणार आहे. तसेच यापूर्वी भरलेले ६८ कोटी रुपये परत मागविण्यात आले आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
स्मार्ट सिटीचा हिस्सा भरण्यासाठी २५० कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे ही रक्कम स्मार्ट सिटीलाच जाईल. दरम्यान यापूर्वी भरण्यात आलेले ६८ कोटी रुपये परत घेऊन ते शहरातील विकास कामांसाठी, थकीत बिले देण्यासाठी वापरली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




