उल्हासनगरात उन्हामुळे दुचाकी पेटली; घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर - सध्या तापमानात मोठी वाढ झाली असून यामुळे एका दुचाकीला आग लागल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील समता नगरमध्ये हा प्रकार घडला. शेजारीच लागलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीला आग लागण्याचा थराराक प्रकार कैद झाला. उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील समता नगरमध्ये राजेश गुप्ता ते वास्तव्याला आहेत.

शनिवारी दुपारी गुप्ता हे त्यांच्या बुलेट मोटरसायकलवर बसलेले असतानाच अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे गुप्ता यांनी गाडी तशीच सोडून स्वतःचा बचाव केला. त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या गाडीने पेट घेतला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पाणी, रेती, माती, फायर एक्सटिंग्विशर यांच्या सहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटपर्यंत ही आग विझली नाही. त्यामुळे संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply