पुणे : करोनाकाळानंतर यंदा पहिल्यांदाच शेती उत्पादन मुबलक येणार असून गेल्या पाच वर्षांतील विक्रमी आकडा गाठण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, पावसाचे बिघडलेले चक्र या पार्श्वभूमीवर देखील शेतकऱ्यांनी नियोजन करीत उत्पादनाचा उच्चांक गाठण्यासाठी कष्ट केले आहेत.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी देशातील कृषी उत्पादनाविषयीचा चौथा सुधारित अंदाज जाहीर केला. या वेळी तोमर म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा २५ दशलक्ष टनांनी अन्नधान्याचे उत्पादन जास्त होणार आहे. प्रामुख्याने तांदूळ, मका, हरभरा, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, मोहरीसह अन्य तेलबिया आणि उसाच्या उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. केंद्र सरकारचे शेतीपूरक धोरण आणि शेतकऱ्यांच्या कष्टाच्या जोरावर हे विक्रमी उत्पादन निघत आहे.’’
चौथ्या सुधारित अंदाजानुसार अन्नधान्यांचे ३१५.७२ दशलक्ष टन उत्पादन होईल. त्यात तांदूळ १३०.२९ दशलक्ष टन आणि गव्हाचे १०६.८४ दशलक्ष टन उत्पादन होईल. भरड धान्याचे उत्पादन ५०.९० दशलक्ष टन, मका ३३.६२ दशलक्ष टन, डाळी २७.६९ दशलक्ष टन, तूर ४.३४ दशलक्ष टन, हरभरा १३.७५ दशलक्ष टन, तेलबिया ३७.७० दशलक्ष टन, भुईमूग १०.११ दशलक्ष टन, सोयाबीन १२.९९ दशलक्ष टन, मोहरी ११.७५ दशलक्ष टन, ऊस ४३१.८१ दशलक्ष टन, कापूस ३१.२० दशलक्ष गाठी (एका गाठ १७० किलो), ज्यूट (ताग) आणि मेस्ता १०.३२ दशलक्ष गाठींच्या (एक गाठ १८० किलो) उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उसाचे काय?
उसाचा विचार करता देशात २०२१-२२मध्ये उसाचे ४३१.८१ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशात उसाचे सरासरी उत्पादन ३७३.४६ दशलक्ष टन होते. यंदा त्यात ५८.३५ दशलक्ष टनांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कापूस मात्र..
देशात यंदा ३१२.०३ दशलक्ष गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे उत्पादन मागील वर्षांपेक्षा कमी आहे. मागील वर्षी (२०२०-२१) ३५२.४८ दशलक्ष गाठींचे उत्पादन झाले होते. अतिवृष्टी, अवेळी पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून कमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष काय? देशात २०२१-२२ या वर्षांत अन्नधान्याचे विक्रमी ३१५.७२ दशलक्ष टन उत्पादन होईल, हे गेल्या वर्षीपेक्षा ४.९८ दशलक्ष टनांनी जास्त असेल, असा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्तविला आहे.
तांदूळ उच्चांकी..
२०२१-२२ या वर्षांत विक्रमी तांदूळ उत्पादनाचा अंदाज आहे. सुमारे १३०.२९ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या १३.८५ दशलक्ष टनांनी अधिक उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी ११६.८४ दशलक्ष टन उत्पादन होत आहे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर