जळगाव ते मुंबई विमान सेवा रद्द करण्यात आली आहे

जळगाव : जळगाव विमानतळावर डूजेट एयरवेज ही खाजगी विमान कंपनी जळगांव ते मुंबई आणि जळगांव ते अहमदाबाद या हवाई मार्गावर सप्टेंबर 2019 पासून विमानप्रवाशांना सेवा देत आहे. टाटा कंपनीने तांत्रिक कारणांसाठी 20 एप्रिलपर्यंत जळगाव ते मुंबई, मुंबई ते अहमदाबाद अशी सेवा बंद केली आहे.

विमान कंपनीने ऑपरेशनल रीजन या कारणामुळे काही काळासाठी विमानसेवा रद्द केली. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 एप्रिलपर्यंत  जळगांव ते मुंबई विमानसेवा स्थगित करण्यात आलेली आहे. कंपनीतर्फे दूरध्वनीद्वारे असे कळविण्यात आले आहे की, काही दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे कंपनीचे ऑनलाईन पोर्टलवरील बुकिंग सेवा बंद करण्यात आली आहे. जळगांव विमानतळावरील बुकिंग काउंटर सेवा सुद्धा बंद आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *