पुणे : केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने देशातील सर्व रासायनिक खत कंपन्यांना रासायनिक खतांच्या बरोबर सेंद्रिय आणि जैविक खते विक्रेत्यांना पुरविण्याचे आदेश दिले होते. हा आदेश बंधनकारक होता. मात्र, कंपन्यांनी सेंद्रिय आणि जैविक खतांचा पुरवठा करणे तांत्रिकृष्टय़ा शक्य नसल्याचे म्हणत केंद्राच्या आदेशाला धुडकावून लावले आहे. केंद्राचा हा आदेश वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोपही खत कंपन्यांनी केला आहे.
बहुतेक खत कंपन्यांकडे सेंद्रिय, जैविक खतांचे उत्पादन करण्याचे प्रकल्प नाहीत, शिवाय इतक्या मोठय़ा प्रमाणावर सेंद्रिय आणि जैविक खते अन्य कंपन्यांकडून खरेदी करून त्यांचा पुरवठा करावा, अशी देशात स्थिती नाही, असे कंपन्यांनी म्हटले आहे. शिवाय अन्य कंपन्यांकडून खरेदी केलेली सेंद्रिय आणि जैविक खते निकषांप्रमाणे आहेत का, याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. सेंद्रिय, जैविक खतांचा आग्रह धरणे योग्य आहे, काळाची गरजही आहे. पण, वस्तुस्थिती विचारात न घेता केंद्राने आदेश दिले आहेत. त्यामुळे हा आदेश बंधनकारक असला तरीही त्याची अंमलबजावणी करणे शक्यच नव्हते. सेंद्रिय, जैविक खतांच्या वापराला प्राधान्य देतो आहोत, हे दाखविण्यासाठीच हा आदेश काढण्याचा फार्स केला गेला आहे, असेच प्रथमदर्शनी दिसते.
वार्षिक गरज..
२०२१-२२ या वर्षांत ३५४.३४ लाख टन रासायनिक खतांचा वापर देशात झाला आहे. त्यात युरिया, डाय अमोनियम फॉस्फेट, मोनेट ऑफ पोटॅश, मिश्र खते, सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचा समावेश आहे. या तुलनेत सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर अगदीच नगण्य आहे. सेंद्रिय आणि जैविक खत उत्पादकांची देशाच्या पातळीवर संघटना नसल्यामुळे एकूण उत्पादन, वापर याची निश्चित आकडेवारी मिळत नाही. शिवाय देशव्यापी धोरणाचाही अभाव आहे.
केंद्राने दिलेले आदेश वस्तुस्थितीला धरून नाहीत. मुळात रासायनिक खते आणि सेंद्रिय, जैविक खतांचे उत्पादन हा दोन भिन्न बाबी आहेत. मोजक्याच रासायनिक खत कंपन्यांचे सेंद्रिय, जैविक खत निर्मितीचे प्रकल्प आहेत आणि त्यांची क्षमताही कमी आहे. सेंद्रिय, जैविक खत निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपन्यांना सर्वतोपरी मदत करून दर्जेदार उत्पादनांवर भर दिला गेला पाहिजे. त्यांचे परवाने आणि दर्जा तपासणीचे कामही पारदर्शक पद्धतीने आणि वेगाने व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये जागृती केली पाहिजे, फक्त आदेश देऊन सेंद्रिय, जैविक खतांचा वापर वाढणार नाही.
-विजयराव पाटील, खत उद्योगाचे अभ्यासक
नक्की काय झाले?
केंद्रीय खते आणि रसायन मंत्रालयाने २७ मे रोजी देशात सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर वाढावा, शेतकऱ्यांना रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय आणि जैविक खते उपलब्ध व्हावीत, या चांगल्या हेतूने खत कंपन्यांना सेंद्रिय आणि जैविक खतांचा पुरवठा करावा, असे आदेश दिले होते. हे आदेश बंधनकारक होते. मात्र, कंपन्यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही.
देशभरात सेंद्रीय आणि जैविक खतांचा वापर वाढून, जमिनी सुपीक होण्यासाठी केंद्राचा हा आदेश महत्त्वपूर्ण आहे. अनेक कंपन्यांनी या आदेशाचे पालन केले आहे. ग्रामीण भागात रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय, जैविक खते दिली जात आहेत, अनेक ठिकाणांहून ते लिंकिंग आहे, अशा तक्रारी आल्या आहेत. पण, ते लिंकिंग नाही. जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय आणि जैविक खतांची गरज आहे.
-दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण
शहर
- Pimpri Chinchwad Crime : पिंपरीतील १८ वर्षीय तरुणीचा शेजाऱ्यानेच काटा काढला, परराज्यातील मामा-भाच्याला अटक; हत्येचं कारण समजलं?
- Mumbai Marathi School : मुंबईत १० वर्षात १०० मराठी शाळा बंद; मराठी भाषा जगणार कशी?
- Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर; वीज पडून ६ जणांचा मृत्यू, १४ जनावरे दगावली
- Whatsapp : वर स्टेट्स, बाथरूममध्ये जाऊन गळा चिरला; बीडच्या तरूणानं पुण्यात आयुष्य संपवलं
महाराष्ट्र
- Kolhapur : अंबाबाई अन् जोतिबा मंदिरात शॉर्ट ड्रेसला मनाई, पश्चिम देवस्थान समितीचा निर्णय
- Maharashtra Monsoon : वार्ता आनंदाची! मान्सून आगमनाची तारीख ठरली, पुणे IMD ने वर्तवला अंदाज
- Washim Crime : मध्यरात्री दोन गटात तुफान दगडफेक, वाशिममध्ये तणाव, सहा जणांना घेतले ताब्यात
- 10th SSC Result : परंपरा राखली! यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा