मुक्तछंद:सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर, पण पाहतो का आपण?; वाचा मानसी वैद्य यांचा हुरहुर लावणारा कॉलम!


एवढा वेळ हे सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर होतं न? याच जागेवरून किती वेळा फिरला पाळणा! पण आपण पाहिलंच नाही.. आजही तो अनुभव आठवतो आणि वाटलं same goes with life! सगळं इथंच असतं, पण खरंच पाहतो का आपण?… तसं शाळेत ‘माझा आवडता ऋतू’ असा निबंध लिहिताना ‘हिवाळा’, असं लिहिलं नाही मी कधी, पण आता आता विचार केला की वाटतं छान असतो की हा ऋतू! लहानपणी अनुभवलेला हिवाळा तर कितीतरी वेगळा आणि भारी होता! पण तेव्हा त्याची गंमत शोधण्यापेक्षा सकाळी सकाळी कुडकुडत शाळेत जावं लागतंय याचा रागच जास्त यायचा. नोव्हेंबर डिसेंबरची थंडी सुरू झाली की आपोआप पंखे बंद व्हायला लागायचे. सटकन् एखादी शिंक आली की मग थंडीला भयंकर सिरियसली घेतलं जायचं. माळ्यावरून ट्रंकेत जपून, डांबर गोळ्या घालून ठेवलेले स्वेटर्स खाली यायचे, गोधड्या बाहेर निघायच्या. लोकरीची टोपी आणि स्वेटर हाच मग युनिफॉर्म आहे की काय, असं वाटायला लागायचं. अशात शाळेतलंही वातावरण बदलून जायचं. सहामाही संपल्यानं कुणाला परीक्षा आणि अभ्यासाची घाई नसायची. गॅदरिंग आणि सहलीचं वारं भिरभिरायचं सगळीकडं. त्यामुळं मग शाळेत जाताना जरी वैतागलेले असलो, तरी शाळा सुटताना मात्र मजेतच असायचो आम्ही! हटकून मग शाळेबाहेर खाऊ विकायला बसणाऱ्या आजीकडून ढाळा, बोरं, छोटे आवळे घेतले जायचे. स्वेटरच्या खिशातला हा खाऊ खात वाट कधी संपायची कळायचंच नाही! पुढे मग जानेवारी सुरू झाला की वेगळीच मजा! शाळेत चक्क जवळपास आठवडाभर सुट्टीच मिळायची संक्रांतीकरता. गोधड्या पांघरून सकाळच्या थंडीला वाकुल्या दाखवत निवांत झोपण्याचं सुख देणारी सुट्टी. शिवाय गुळपोळी, शेंगदाण्याची पोळी, तीळगुळाच्या वड्या, लाडू, बाजरीच्या टम्म फुगलेल्या भाकऱ्या नि त्यावर वितळत जाणारा शुभ्र लोण्याचा मऊसूत गोळा! संक्रांतीसोबत थंडीसुद्धा साजरी करतोय वाटावं असे एक एक पदार्थ. त्यांचा घरभर पसरलेला दरवळ नाकात साठवत गच्चीवर जावं तर आकाशात पाहावं तिथे पतंगच पतंग! मला पतंग उडवता येत नसला, तरी समोरच्या बिल्डिंगमधल्या मुलामुलींचा पतंग आपल्या इमारतीमधली मंडळी कापतात न, हे पाहण्याची भयंकर उत्सुकता असायची. जोरदार असल्या तरी निकोप , निरागस स्पर्धा असायच्या या. याच दिवसात सोलापुरात मानाच्या काठ्यांची पूजा असायची. ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या मंदिरात. खरं म्हणजे शहरभरातच मोठा उत्सव असायचा. गड्डा भरायचा! गड्ड्यावर जाणं जवळपास ‘शास्त्र असतं’ म्हणण्याइतकं महत्त्वाचं होतं. सुट्टीतच एक सोयीचा दिवस ठरवून सगळं कुटुंब फिरायला निघायचं! फूड कोर्ट कम शॉपिंग मॉल कम अम्यूझमेंट पार्क असं सगळंच असायचा गड्डा! खेळण्यातल्या रायफलनं नेमबाजी करणं असो, भूतबंगला खोटा आहे, ठाऊक असूनही भिणं असो, वा आयनामहलमधल्या करामतींमधे रमणं असो! फार साधा, गोड आनंद होता तो. एकदा असेच गड्ड्यावर गेलो होतो आणि कधी नव्हे ते पाळण्याचं तिकीट काढलं मी. अगदी अलगद एक चक्कर पार पडली आणि हळूहळू पाळण्यानं वेग पकडला. सगळी शक्ती एकवटून ग्रील धरत बेंबीच्या देठापासून किंचाळणारी मी हे अचाट विनोदी दृश्य असावं! शेवटी थोड्या वेळानंतर एकेका पाळण्यामधले लोक उतरण्यासाठी हळूहळू थांबवले जायला लागले. मी डोळे उघडून पाहिलं तर सगळ्यात उंच जागी येऊन थांबला होता माझा पाळणा. इतक्या उंचावरून भवतीचा तो झगमगता गड्डा, सगळी दुकानं, थोडं दूर चमकणारं तलावामधलं पाणी, त्याहीपलीकडचं शहर, इवली इवली माणसं, नि ह्या सगळ्यावर पसरलेलं आकाश, चांदणं आणि चंद्र! वाटलं, एवढा वेळ हे सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर होतं न? याच जागेवरून किती वेळा फिरला पाळणा! पण आपण पाहिलंच नाही.. आजही तो अनुभव आठवतो आणि वाटलं same goes with life! सगळं इथंच असतं, पण खरंच पाहतो का आपण? असो! परवा एका रीलमधे फार सुंदर शब्द ऐकला, Apricity. त्याचा अर्थय थंडीच्या दिवसांमधल्या उन्हामुळं मिळणारी ऊब! वाटलं, ह्या गोड आठवणी म्हणजेसुद्धा आपल्याकरता apricity आहेत की. तेव्हा या मकरसंक्रांतीच्या निमित्तानं, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या रूपात ही Apricity गवसो याच शुभेच्छा!


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:योगाची सवय लावली‎ तर तो स्वभाव बनतो


चांगल्या सवयी परिणाम वर्तमानात दिसतात तर वाईट सवयींचे‎परिणाम भविष्यात लपून राहतात. मनुष्य जीवनात नियम आणि सवयी‎असतात. सवयी चांगल्या असतील तर त्या पाळणे सोपे असते. वाईट‎सवयी असलेल्यांना त्या मोडण्याचा आनंद मिळतो. भ्रष्ट पद्धती टाळणे‎हा सरकारी नियम आहे. पण कितीही चांगले लोक सत्तेत आले तरी‎देशात भ्रष्टाचार जात नाही. भ्रष्टाचाराची व्याख्या देताना एका‎अधिकाऱ्याने नोकरशाहीचा भ्रष्टाचार चार प्राण्यांच्या उदाहरणांवरून‎मला सांगितला. पहिला- पैसा नैसर्गिकरित्या येतो – उदाहरणार्थ- मासे‎पाण्यात राहतात आणि नकळत पितात. दुसऱ्या श्रेणीतील लोक‎गायींसारखे असतात. मागून घेतात. तिसरे हिसकावून घेतात. म्हणजे‎माकडाची श्रेणी. चौथे- सिंहांसारखे असतात. फक्त लुटतात. पण‎तुम्ही योगाची सवय लावली तर तो स्वभावाचा भाग बनेल. परिणामी‎चांगल्या सवयी नैसर्गिकरित्या विकसित होतील.‎


Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:वृद्धांच्या वैद्यकीय सेवेसाठी स्टार्टअप्सनी ‘आर अँड डी’ करायला हवे


१५ जानेवारी रोजी दुपारी माझ्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. मेसेज उघडताच नागपूरच्या धरमपेठच्या खारी टाऊन येथील परांजपे स्कूलमधील मतदान केंद्रातून १०२ वर्षीय आर.एस. कुप्पुस्वामी यांचा फोटो दिसला. ते उभे होते. कंबरेत थोडेसे वाकलेले होते. त्यांच्या डाव्या तर्जनीवर काळी शाई दिसत होती. महाराष्ट्रात गुरुवारी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी मतदान केल्याचा तो पुरावा होता. मी त्यांना अनेक कारणांमुळे वैयक्तिकरीत्या ओळखतो. ते माझ्या वडिलांचे सर्वात चांगले मित्र होते. ते नागपूर रेल्वे स्टेशनवर एकत्र काम करायचे. त्यांच्या दिवंगत पत्नी, श्रीमती सरस्वती कुप्पुस्वामी या मी जिथे शिकत होतो त्या सरस्वती विद्यालयाच्या प्राथमिक विभागात शिक्षिका होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निवृत्त न्यायाधीश सत्येंद्र धर्माधिकारी आणि अनेक प्रसिद्ध डॉक्टरांसह अनेक व्यावसायिकांनी एकाच शाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. शाळेत अनेक विभाग असल्याने मला वाटते की श्रीमती कुप्पुस्वामी यांनी या यशस्वी लोकांच्या जीवनाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्पर्श केला असेल – कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याची दहा वर्षे तिथे घालवली. मी त्यांची मुलगी भानू यांना फोन केला. तिने हा फोटो पाठवला. ती एक निवृत्त प्राध्यापक आहे. तिने मला सांगितले की तिचे वडील अजूनही आधाराशिवाय चालतात. त्यांचे डोळे आणि कान पूर्वीसारखे काम करत नाहीत. मी म्हणालो, ते अजूनही आधाराशिवाय चालतात हे ऐकून बरे वाटले. कारण दरवर्षी लाखो वृद्ध लोक पडल्यामुळे अंथरुणाला खिळलेले असतात. खरे तर पडणे ही कधीही समस्या नसते. वृद्ध लोक पडल्यानंतर तासन‌्तास मदतीशिवाय घालवतात. सर्वात गंभीर हानी तेव्हाच होते. त्वरित मदत मिळते त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी असते आणि ते स्वतंत्र जीवन जगू शकतात. या वर्षी ९ जानेवारीपासून युनायटेड स्टेट्सने “फास्टहेल्प’ नावाचे एक नवीन, आकर्षक वैद्यकीय अलर्ट डिव्हाइस लाँच केले. हे एक-टच बटण देशातील कोणत्याही ठिकाणी ज्येष्ठांना अमर्याद मदतीसाठी त्वरित जोडते. एकदा खरेदी केल्यानंतर, ३०० डॉलर्सपेक्षा कमी किमतीच्या या डिव्हाइसवर कोणताही करार नाही. मासिक बिल नाही आणि ठेव नाही. “फास्टहेल्प’ मध्ये अत्याधुनिक सेल्युलर एम्बेडेड तंत्रज्ञान आहे. म्हणून ते आयुष्यभर टिकते आणि सर्वत्र कार्य करते. वन टच ई-बटण वृद्धांना कोणत्याही सोयीशी जोडते. बहुतेक ज्येष्ठांनी ते ताबडतोब खरेदी केले. लाँच झाल्यानंतर पहिल्या ७२ तासांसाठी १५० डॉलर्सची सवलत दिली होती. त्याच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे जुन्या उपकरणांना मासिक भाडे आवश्यक होते. सध्या ते १९६४ पूर्वी जन्मलेल्यांसाठी म्हणजेच बेबी बूमर्ससाठी विकले जात आहे. २०२६ पर्यंत ते आतापर्यंतचे सर्वात वेगाने विकले जाणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण बनले आहे. त्याला लँडलाइन किंवा सेलफोनची आवश्यकता नाही. एका बटणाच्या दाबावर ते वृद्धांना विशाल सेल्युलर नेटवर्कशी जोडते. त्यामुळे त्यांना कोणतेही बिल भरण्यापासून वाचवले जाते. त्याच्या आकर्षक लूकचा फायदा असा आहे की ते वृद्धांना वृद्ध नाही तर विशेष वाटते. भारत सरकारकडे १४५६७ ही राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनही आहे. ही सेवा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असते. ती माहिती आणि क्षेत्रीय हस्तक्षेप साहाय्य प्रदान करते. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवा आणि रुग्णालयात दाखल करणे समाविष्ट आहे. आपल्या देशातील वाढती वृद्ध लोकसंख्या पाहता आपण अशा कल्पनेचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किमान स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा जलदपणे मिळू शकतील. आपल्या आयटी आणि टेलिकॉम तज्ज्ञांसाठी “फास्टहेल्प’ सारखे किंवा त्यापेक्षा चांगले उत्पादन विकसित करायला हवे.
फंडा असा की, आपल्या देशातील अंदाजे १६ कोटींहून जास्त वृद्ध लोक पाहता त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले कोणतेही साधन लवकर लोकप्रिय होऊ शकते. हा बाजार महत्त्वाकांक्षी स्टार्टअप्ससाठी खुला आहे. आधी यासंबंधी आर अँड डी अर्थात संशोधन व विकास करावा.


Continue Reading

पवन के. वर्मा यांचा कॉलम:निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांस‎का बरे लक्ष्य केले जातेय?‎


This post was originally published on this site.


Continue Reading

पवन के. वर्मा यांचा कॉलम:निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांस‎का बरे लक्ष्य केले जातेय?‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎ईडी आणि इतर तपास संस्था निवडणुकीपूर्वीच विरोधी‎पक्षांना लक्ष्य करतात का? प्रथमत: या प्रश्नावर ईडीचा -‎आणि भाजपचा युक्तिवाद – सैद्धांतिकदृष्ट्या योग्य‎वाटतो : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील कारवाई‎निवडणुकीच्या टप्प्यांद्वारे निश्चित केली जाऊ शकत‎नाही. गैरकृत्ये समोर येत असतील तर राजकीय‎कॅलेंडरची पर्वा न करता तपास केला पाहिजे. कोणाच्याही‎सोयीसाठी त्यांना थांबवू नये.

पण, हा केवळ योगायोग आहे का की निवडणुकीपूर्वी‎विरोधी पक्षांना सातत्याने लक्ष्य केले जाते. केंद्रातील‎सत्ताधारी पक्षाला अशा तपासांना सामोरे जावे लागत‎नाही? संविधानाने असे आदेश दिले आहेत की तपास‎संस्थांनी भीती किंवा पक्षपात न करता काम करावे. त्यांनी ‎‎राजकीय फायदा घेण्याऐवजी त्यांची कर्तव्ये पार‎पाडावीत. तरीसुद्धा गेल्या दशकातील राजकीय कथेचा ‎‎बारकाईने विचार केल्यास ईडी आणि सीबीआय‎न्यायाच्या साधनांपेक्षा राजकारणाचे साधन म्हणून अधिक ‎‎काम करत आहेत या विश्वासाला बळकटी मिळते. ‎‎राजकारणात सार्वजनिक धारणा ही लोकशाही स्पर्धा ‎‎अवलंबून असलेल्या वर्तन, विश्वास आणि निष्पक्षतेला ‎‎आकार देते. लाखो मतदारांना निवडणूक क्षेत्रात‎असमानता जाणवू लागते तेव्हा निकालांची वैधता आणि‎लोकशाही जाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणूनच केंद्रीय‎संस्थांकडून पक्षपातीपणाची धारणा केवळ तक्रार म्हणून‎पाहू नये; ती लोकशाहीमध्ये समान सहभागाच्या भावनेत‎रुजलेली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी‎तृणमूलच्या राजकीय सल्लागार कंपनी-‎आय-पीएसीवरील छाप्यामुळे ही धारणा आणखी बळकट‎झाली. सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे. राज्य‎आणि केंद्राच्या निवडणुकांमध्ये ‘आप’ला देखील ईडी‎आणि सीबीआयच्या अशाच कारवाईचा सामना करावा‎लागला होता. २०२१ च्या तामिळनाडू विधानसभा‎निवडणुकीदरम्यान द्रमुक प्रमुख एमके स्टॅलिन यांच्या‎कुटुंबातील सदस्यांवर आयकर छापे टाकण्यात आले होते‎आणि ईडीने अनेक मंत्र्यांचीही चौकशी केली होती. गेल्या‎दशकातील अशा कृतींना निवडणूक परिदृश्यातून वेगळे‎करून पाहणे कठीण आहे. हे तपास संस्था राजकीय‎पोकळीत काम करत नाहीत. विशेषतः निवडणुकीदरम्यान‎ते प्रमुख नेत्यांविरुद्ध – जाणूनबुजून किंवा चुकून -‎कारवाई करतात तेव्हा त्याचे राजकीय परिणाम‎अपरिहार्यपणे होतात. २०१४ पासून उपलब्ध असलेल्या‎डेटाच्या विश्लेषणातून असे दिसून येते की सीबीआय‎आणि ईडीने दाखल केलेली सुमारे ९५% प्रकरणे विरोधी‎नेत्यांविरुद्ध आहेत. ईडीच्या छाप्यांमध्येही लक्षणीय वाढ‎झाली आहे. २०१४ पर्यंतच्या दशकात ईडीच्या छाप्यांची‎संख्या शंभरच्या आसपास होती. ती नंतरच्या दशकात‎हजारोंवर पोहोचली. आणि सध्याच्या केंद्रीय‎मंत्रिमंडळातील ७२ मंत्र्यांपैकी २९ मंत्र्यांवर (जवळपास‎४०%) गुन्हेगारी खटले दाखल आहेत हे असूनही असे‎घडते. ही माहिती मंत्र्यांनी स्वतः निवडणूक आयोगाला‎दिलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यात हत्या,‎खून करण्याचा प्रयत्न, अपहरण, चोरी आणि फसवणूक‎यासारख्या आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणांची‎चौकशी देखील त्याच कठोरतेने आणि वेगाने झाली आहे‎का? राजकीयदृष्ट्या एका पक्षावर हा पद्धतशीर दबाव हेतू‎सिद्ध करत नसला तरी तो असमानतेची धारणा निश्चितच‎बळकट करतो. व्यवस्थेत संस्थांवर विश्वास आधीच‎कमी आहे. तिथे लोकशाही स्पर्धेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎शंका निर्माण होतात. लक्षात घ्या की आपण येथे‎आरोपांच्या गुणवत्तेवर चर्चा करत नाहीत; त्यासाठी‎चौकशी आवश्यक आहे. परंतु कोणत्याही लोकशाहीमध्ये‎एक पक्ष निवडणूक प्रचारादरम्यानही संस्थात्मक‎तटस्थतेचा पूर्ण फायदा घेत असेल आणि दुसरा पक्ष‎सतत तपासणीला सामोरे जात असेल तर समान संधीची‎भावना कमकुवत होते. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचे‎आरोप हे केवळ वैयक्तिक बाबी नाहीत; तर तो‎विश्वासाचा प्रश्न आहे. हा विश्वास तुटतो तेव्हा त्याचा‎दबाव संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर जाणवतो.‎
मतदारांना असे वाटू लागते की‎निवडणुकीचे मैदान समतुल्य नाही, तेव्हा‎निकालांची वैधता आणि लोकशाही‎जाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणून,‎केंद्रीय संस्थांकडून पक्षपातीपणाच्या‎धारणेकडे तक्रार म्हणून पाहिले जाऊ नये.‎


Continue Reading

आरती जेरथ यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपलेच निर्णय सुप्रीम कोर्ट‎ वारंवार का फिरवतेय ?‎


जेव्हा सर्वोच्च न्यायालय आपल्याच निर्णयांना वारंवार‎बदलते तेव्हा तो सार्वजनिक चिंतेचा विषय बनतो. २०२५‎मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले आठ निर्णय फिरवले.‎अनेक आदेश तर दिल्यानंतर काही आठवड्यांतच‎बदलले गेले. सर्वोच्च न्यायालयाने भूतकाळात आपल्या‎निर्णयात बदल किंवा सुधारणा केली नाही असे नाही,‎परंतु असे सहसा तेव्हाच घडले होते, जेव्हा एखाद्या‎पक्षाने प्रकरणाच्या पुनरावलोकनासाठी मोठ्या‎खंडपीठाकडे दाद मागितली होती. मात्र, अलीकडील‎घडामोडी वेगळ्या आहेत. कारण हे निर्णय‎न्यायालयाच्या आतूनच फिरवले गेले. दुसऱ्या शब्दांत,‎सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन ही प्रकरणे‎इतर खंडपीठांकडे पाठवली, ज्यांनी पहिल्या खंडपीठाचा ‎‎निर्णय बदलला. विधिज्ञांच्या मते, सर्वोच्च न्यायालयात‎असे पहिल्यांदाच घडत आहे. ही पद्धत सुरू राहिली तर‎ती न्यायशास्त्राच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे.‎कारण यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची वैधता ‎‎कमकुवत होईल. ज्या विषयांवरील निर्णय मागे घेण्यात ‎‎आले त्यामध्ये न्यायालयीन शिस्तीपासून ते पर्यावरणाचे ‎‎विषय, कॉर्पोरेट मुद्दे आणि भटक्या कुत्र्यांच्या‎प्रकरणांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे बदलण्यात‎आलेल्या आठ निर्णयांपैकी तीन निर्णय न्यायमूर्ती जे. बी.‎पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिले होते, जे भविष्यात‎भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. हे देखील रंजक‎आहे की, हे निर्णय बदलण्याची सुरुवात निवृत्त न्यायमूर्ती‎बी.आर. गवई यांच्या कार्यकाळात झाली. विद्यमान‎सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यकाळातही हा‎सिलसिला सुरू आहे. अरावली खाणकामाशी संबंधित‎निर्णयाचा उलटफेर सर्वात धक्कादायक होता.‎ तत्कालीन सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालील‎खंडपीठाने २० नोव्हेंबर रोजी खाणकामाच्या‎नियमनासाठी सरकारी समितीने सुचवलेली उंचीसंबंधी‎व्याख्या मान्य केली होती. पर्यावरणवादी आणि‎सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर सरन्यायाधीश‎सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्या‎निर्णयाला स्थगिती दिली आणि या मुद्द्याच्या‎पुनर्मूल्यांकनासाठी विषयतज्ज्ञांची एक नवीन समिती‎स्थापन केली. नवीन आदेशात म्हटले आहे की,‎‘जनभावना’ लक्षात घेऊन आधीच्या निर्णयाचे‎पुनरावलोकन केले जात आहे. सार्वजनिक विरोधाच्या‎प्रतिसादात न्यायालयीन पुनरावलोकनाचे पाऊल‎स्वागतार्ह असले तरी यामुळे आधीचा निर्णय कशा‎प्रकारे घेतला गेला होता यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.‎दिल्ली आणि हरियाणाची फुप्फुसे मानल्या जाणाऱ्या‎अरावली टेकड्यांसाठी सरकारी समितीची‎उंची-आधारित व्याख्या स्वीकारण्यापूर्वी मागील‎खंडपीठाने पुरेसा विचार केला नव्हता का? की ही‎स्थगिती केवळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न होता?‎ आधीचे निर्णय फिरवण्याच्या वेळेमुळे (टायमिंग) हे गूढ‎अधिकच वाढले आहे. अरावलीतील खाणकामाला‎हिरवा कंदील दाखवणारा पहिला निर्णय तत्कालीन‎सरन्यायाधीश गवई यांच्या निवृत्तीच्या अवघ्या तीन‎दिवस आधी, २० नोव्हेंबर रोजी आला. त्यानंतर पाच‎आठवड्यांनी २९ डिसेंबर रोजी हा निर्णय फिरवण्यात‎आला. हिवाळी सुट्टीच्या काळात सरन्यायाधीश सूर्यकांत‎यांनी यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन केले.‎न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎यांच्या खंडपीठाने निर्णय मागे घेण्याच्या या नवीन‎पद्धतीतील धोक्यांबाबत इशारा दिला होता. हा इशारा‎अरावलीचा निर्णय बदलण्याच्या अगदी आधी आला‎होता. स्पष्ट आहे की, त्यांच्या सावधगिरीच्या‎बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन्ही न्यायाधीशांनी‎म्हटले होते की, ‘एखाद्या कायदेशीर विषयावर‎खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे वाद संपला पाहिजे.‎कारण तो अंतिम असतो… केवळ नंतर एखादा दुसरा‎दृष्टिकोन अधिक चांगला वाटतो म्हणून एखादा निकाल‎पुन्हा उघडला गेला तर कलम १४१ लागू करण्याचा‎उद्देशच अपयशी ठरेल… यामुळे न्यायालयाचा अधिकार‎आणि निकालांचे मूल्य कमकुवत होईल.’‎ सर्वोच्च न्यायालय सध्या सरकारी दबाव, जनहित आणि‎संविधान यांच्यातील एका संतुलित रेषेवर चालत आहे.‎ ( ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत. )‎‎ न्यायालयांकडून, विशेषतः सर्वोच्च‎न्यायालयाकडून अशी अपेक्षा केली जाते‎की, कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांनी‎सर्व कायदेशीर पैलूंचा गांभीर्याने विचार‎करावा. एकदा आदेश दिला की तो‎सर्वमान्य असला पाहिजे.‎


Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:2026 मध्ये कामाच्या ठिकाणी या 10 बदलांची अपेक्षा आहे


फंडा असा आहे की, २०२६ हे वर्ष कामाच्या ठिकाणी अधिक आव्हानात्मक असणार आहे, कारण आपण एआयच्या जगात पाऊल ठेवत आहोत. जे लोक हे बदल स्वीकारतील, तेच पदोन्नतीच्या शर्यतीत पुढे राहतील.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने गिग वर्कर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देत “१० मिनिटांत डिलिव्हरी’ प्रथा रोखण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच २०२६ मध्ये कामाच्या ठिकाणी अनेक बदल पाहायला मिळू शकतात. हे वर्ष ऑटोमेशन, एआय एजंट्सचा व्यापक वापर आणि औद्योगिक विवादांनी प्रभावित असेल असे मानले जात आहे. हे बदल नेमके कसे असतील? तर याची पहिली चाचणी तुमच्या प्रामाणिकपणावर होणार आहे.
१. मी हे एका कंपनीच्या अंतर्गत परिपत्रकावरून स्पष्ट करतो. कंपनीच्या प्रमुखांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग दिवसातून किमान २० मिनिटे पाहावे अशी माझी इच्छा आहे. गरज पडल्यास एका व्यक्तीला २४x७ देखरेखीसाठी ठेवा.’ याचा अर्थ असा की, जेव्हा कुणी पाहत नसते तेव्हा तुम्ही काय करता? आपल्या मूळ मूल्यांशी बांधील राहणे आता अनिवार्य होईल.
२. एआय आता अर्धा कर्मचारी बनत आहे. व्यवसाय आता माणसांप्रमाणेच एआयला प्रशिक्षण देण्यास तयार आहेत. कंपन्या तयार सिस्टिम खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या गरजेनुसार ‘टेलर-मेड’ एआय सिस्टिम विकसित करण्यावर भर देत आहेत.
३. जर तुम्ही लीडर असाल, तर तुम्हाला चॅटजीपीटीपेक्षा चांगले व्हावे लागेल. एआयने कमालीची पारदर्शकता आणली आहे. उत्पादन विभागात काम करणाऱ्यांनाही आता ग्राहकांच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. ग्राहकांना चॅटजीपीटीपेक्षा अधिक अचूक आणि मानवी उत्तरे हवी आहेत.
४. आता सीव्हीच जुने झाले नाहीत, तर पदव्या आणि पदांचा प्रभावही कमी होत आहे. कंपन्यांना त्यांचे लीडर्स ‘इन्फ्लुएन्सर’ असावेत असे वाटते. जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक कौशल्याने इतरांवर प्रभाव टाकू शकत नसाल, तर तुम्ही स्पर्धेबाहेर फेकले जाल.
५. नवीन कर्मचारी आता ‘टेस्टर इंटर्नशिप’ शोधत आहेत. पदवीधर विद्यार्थी प्रथम सहा आठवडे वेगवेगळ्या क्षेत्रांत इंटर्नशिप करून अनुभव घेतील आणि मगच करिअर ठरवतील. दुसरीकडे, नियोक्ता पूर्णवेळ नोकरीच्या खर्चाशिवाय सखोल तज्ज्ञता असलेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट’ आधारित टॅलेंटच्या शोधात आहेत.
६. कंपन्या आता तुम्हाला नाही, तर तुमची वृत्ती (Attitude), चारित्र्य आणि कंपनीच्या संस्कृतीत मिसळण्याची तुमची क्षमता पाहून एखाद्याची नियुक्ती करत आहेत. कौशल्ये शिकवता येतात, पण स्वभाव नाही, हे आता कंपन्यांना उमजले आहे.
७. ‘ब्ल्यू कॉलर’ मुले पुन्हा जोमाने परतताना दिसत आहेत. कुशल कामगार आता कोडिंग इंजिनिअर्सपेक्षा जास्त कमावत आहेत आणि ते कर्जमुक्त आयुष्य जगत आहेत. गेल्या वर्षापर्यंत ज्या नोकऱ्या खालच्या दर्जाच्या मानल्या जात होत्या, त्या आता पहिली पसंती बनत आहेत.
८. कर्मचारी आता मीटिंगमध्ये केवळ स्वतःचे मत मांडणार नाहीत, तर ते त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे संदर्भ घेऊन येतील. बोर्डरूममध्ये आता व्यवसायाचा मूळ हेतू आणि मूल्यांवर आधारित चर्चांना अधिक महत्त्व दिले जाईल.
९. नियोक्ते अशा कर्मचाऱ्यांना अधिक पसंती देतील जे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपले काम अधिक सुलभ आणि वेगवान करू शकतात.
१०. ‘ऑर्केस्ट्रेटर’: नियोक्ते अशा लीडर्सना पसंत करतील जे केवळ कामाच्या अंमलबजावणीपेक्षा समन्वयावर अधिक भर देतील. त्यांच्यासाठी ‘ऑर्केस्ट्रेटर’ हे नवीन जॉब टायटल असेल.


Continue Reading

पंतप्रधान मोदी यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎विश्वनाथ ते रामेश्वरमपर्यंत एक उत्सव‎, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘विविधतेत एकता’ यांचे पर्व आहे काशी-तामिळ संगमम‎


काही दिवसांपूर्वीच मला सोमनाथच्या पवित्र भूमीवर‎सोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्याची सुसंधी‎मिळाली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या‎कानाकोपऱ्यातून लोक सोमनाथला पोहोचले होते. या‎कार्यक्रमादरम्यान माझी काही अशा लोकांशीही भेट‎झाली, जे यापूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगममच्या वेळी‎सोमनाथला आले होते आणि त्याही आधी काशी-तामिळ‎संगममच्या वेळी काशीलाही गेले होते. अशा‎व्यासपीठांबाबतचा त्यांचा सकारात्मक विचार पाहून मी‎खूप प्रभावित झालो. म्हणूनच मी ठरवले की, या‎विषयावर मी माझे काही विचार मांडावेत.‎ ‘मन की बात’च्या एका भागामध्ये मी म्हटले होते की,‎माझ्या आयुष्यात मला तामिळ भाषा शिकता आली नाही‎याचे मला खूप दुःख आहे. हे आपले सौभाग्य आहे की‎गेल्या काही वर्षांपासून आपले सरकार तामिळ संस्कृती‎देशात अधिक लोकप्रिय करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील‎आहे. हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिक‎सशक्त करणारे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘संगम’‎संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या दृष्टीनेही काशी-तामिळ‎संगमम हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. यामध्ये‎भारताच्या विविध परंपरांमधील अद्भूत ताळमेळ तर‎दिसतोच, पण आपण एकमेकांच्या परंपरांचा सन्मान‎कसा करतो, हे देखील समजते. काशी-तमिळ संगममच्या‎आयोजनासाठी काशी हे सर्वात योग्य ठिकाण म्हणता‎येईल. काशीचा तामिळ समाज आणि संस्कृतीशी अत्यंत‎जवळचा संबंध राहिला आहे. काशी हे बाबा विश्वनाथांचे‎शहर आहे तर तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तीर्थ आहे. ‎‎तामिळनाडूतील ‘तेनकासी’ला दक्षिण काशी असे म्हटले ‎‎जाते. तामिळनाडूचे महान सुपुत्र महाकवी सुब्रमण्यम‎भारती यांनाही काशीमध्ये बौद्धिक विकास आणि ‎‎आध्यात्मिक जागृतीची अद्भुत संधी मिळाली. येथेच‎त्यांचा राष्ट्रवाद अधिक प्रबळ झाला आणि त्यांच्या‎कवितांना नवी धार मिळाली. अशी अनेक उदाहरणे‎आहेत. वर्ष २०२२ मध्ये वाराणसीच्या भूमीवर‎काशी-तामिळ संगममची सुरुवात झाली होती. त्याच्या ‎‎उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले ‎‎होते. तेव्हा तामिळनाडूहून आलेल्या लेखक, विद्यार्थी, ‎‎कलाकार, विद्वान, शेतकरी आणि पाहुण्यांनी‎काशीसोबतच प्रयागराज आणि अयोध्येचे दर्शनही घेतले ‎‎होते. संगमममध्ये नवीन विषय जोडले जावेत. नवीन – ‎‎कल्पक पद्धतींचा अवलंब केला जावा आणि लोकांचा ‎‎सहभाग जास्तीत जास्त असावा हा यामागचा उद्देश होता.‎हा उपक्रम आपल्या मूळ भावनेशी जोडलेला राहूनही‎निरंतर पुढे जात राहावा असा प्रयत्न होता. वर्ष २०२३ च्या ‎‎दुसऱ्या आयोजनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर ‎‎करण्यात आला, जेणेकरून भाषा हा त्यामध्ये अडथळा‎ठरू नये. याच्या तिसऱ्या आवृत्तीत भारतीय ज्ञान‎प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याचबरोबर‎शैक्षणिक संवाद, सांस्कृतिक सादरीकरण, प्रदर्शने आणि‎चर्चासत्रांमध्ये लोकांचा मोठा सहभाग पाहायला‎मिळाला. काशी-तामिळ संगममची चौथी आवृत्ती २‎डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली. या वेळची संकल्पना‎अत्यंत रंजक होती. मला ‘तामिळ करकलम’ म्हणजेच‎‘तामिळ शिका’. यात काशी आणि इतर ठिकाणच्या‎लोकांना तामिळ शिकण्याची एक अपूर्व संधी मिळाली.‎तामिळनाडूहून आलेल्या शिक्षकांनी काशीच्या‎विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय बनवला! प्राचीन‎तामिळ साहित्य ग्रंथ ‘तोलकाप्पियम’चा चार भारतीय‎आणि सहा परदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎या अभियानात सांस्कृतिक एकतेचा संदेश पसरवणारे‎पांड्य वंशाचे महान राजा ‘आदि वीर पराक्रम पांडियन’‎यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण आयोजनादरम्यान‎नमो घाटावर प्रदर्शने भरवण्यात आली. बनारस हिंदू‎विद्यापीठामध्ये शैक्षणिक सत्र, विविध सांस्कृतिक‎कार्यक्रमही पार पडले. काशी-तामिळ संगमममध्ये या‎वेळी ज्या गोष्टीने मला सर्वाधिक आनंद दिला.‎त्यांच्यासाठी हे एक असे अद्भुत व्यासपीठ आहे, यातून‎ते आपली प्रतिभा दाखवू शकतात. संगममव्यतिरिक्त‎काशीची यात्राही संस्मरणीय ठरावी, यासाठी विशेष‎प्रयत्न करण्यात आले. भारतीय रेल्वेने लोकांना‎तामिळनाडूहून उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विशेष गाड्या‎चालवल्या. या प्रवासादरम्यान अनेक रेल्वेस्थानकांवर,‎विशेषतः तामिळनाडूमध्ये त्यांचा उत्साह वाढवण्यात‎आला. सुंदर गाणी आणि आपापसांतील चर्चेमुळे हा‎प्रवास अधिक आनंददायी झाला. येथे मी काशी आणि‎उत्तर प्रदेशातील माझ्या बंधू आणि भगिनींचे कौतुक करू‎इच्छितो, ज्यांनी काशी-तामिळ संगमम विशेष बनवण्यात‎मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या पाहुण्यांच्या‎स्वागत आणि आदरातिथ्यात कोणतीही कसर सोडली‎नाही. अनेक लोकांनी तामिळनाडूहून आलेल्या‎पाहुण्यांसाठी आपल्या घरांचे दरवाजे उघडे ठेवले.‎पाहुण्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिक‎प्रशासनही चोवीस तास कार्यरत होते. वाराणसीचा‎खासदार म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची आणि‎समाधानाची गोष्ट आहे. या वेळी काशी-तामिळ‎संगममचा समारोप समारंभ रामेश्वरममध्ये झाला. त्यात‎तामिळनाडूचे सुपुत्र आणि उपराष्ट्रपती सी.पी.‎राधाकृष्णनदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या‎विचारांनी कार्यक्रमाची समृद्धी वाढवली. भारताच्या‎आध्यात्मिक समृद्धीवर भर देताना त्यांनी सांगितले की,‎कशा प्रकारे अशी व्यासपीठे राष्ट्रीय एकात्मता अधिक‎बळकट करतात. शैक्षणिक चर्चा . जनसंवादालाही मोठा‎वावा मिळाला.आपल्या संस्कृतींमधील संबंध अधिक‎दृढ झाले आहेत. वर्षाचा हा काळ प्रत्येक‎देशवासीयासाठी अत्यंत पावन मानला जातो. लोक‎मोठ्या उत्साहाने मकरसंक्रांती, उत्तरायण, पोंगल, माघ‎बिहू यांसारखे अनेक सण साजरे करत आहेत. हे सर्व‎उत्सव मुख्यत्वे सूर्यदेव, निसर्ग आणि शेतीला समर्पित‎आहेत. हे सण लोकांना एकमेकांशी जोडतात, ज्यामुळे‎समाजात सद्भाव आणि एकजुटीची भावना अधिक‎प्रबळ होते. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.‎ काशी-तामिळ संगममचा खोलवर प्रभाव‎पाहायला मिळाला आहे.याद्वारे सांस्कृतिक‎चेतनेला बळकटी मिळालीच, पण‎शैक्षणिक चर्चा, जनसंवादालाही चालना‎मिळाली. यामुळे आपल्या संस्कृतींमधील‎संबंध अधिक दृढ झाले आहेत.‎


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तन्मयतेने केलेल्या कामाचा ‎सुगंध वर्तनातून झळकतो ‎


तुम्ही जे काही कराल ते समर्पणातून करावे.पूजा, प्रार्थना करत असाल‎तर ते समर्पणातून करा. भले मग अल्प काळ का असेना. त्यात‎तन्मयता ठेवावी. त्या क्षणी भूतकाळात काय घडले ,पुढे काय होईल हे‎विसरून जा. २४ तास आपल्या धार्मिक कर्तव्यात पूर्णपणे गुंतलेल्या‎ लोकांना दिवसभरातील त्यांचे इतर वर्तन आकर्षक वाटेल. त्या छोट्या‎समर्पणाचा सुगंध दिवसभरातील आपल्या सर्व वर्तनातून दिसून येईल.‎तुम्ही तुमच्या कुटुंबात असाल किंवा व्यवसायात. तुमचे वर्तन‎आकर्षक होईल. लोकांना तुमच्याभोवती साधेपणा, स्पष्टवक्तेपणा,‎सत्यता आणि गोडवा जाणवेल. कारण तुमच्या दिनचर्येत तुम्हाला चार‎प्रकारचे लोक भेटतील : एक म्हणजे जवळचे लोक, दुसरे सामान्य‎ ओळख असलेले, तिसरे व्यर्थ लोक आणि प्रभावशाली लोक. या‎चारही प्रकारच्या लोकांशी समानतेने वागा. हा एक प्रकारचा योग आहे.‎मेडिटेशन- कारण भक्त प्रत्येकामध्ये देव पाहतो.‎


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तन्मयतेने केलेल्या कामाचा ‎सुगंध वर्तनातून झळकतो ‎


This post was originally published on this site.


Continue Reading