मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!

नवी दिल्ली:  केंद्र सरकारने 'EPF 2026' या नवीन योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधी (PF) मधून पैसे काढण्याबाबत अत्यंत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. आता पीएफचे पैसे काढणे पूर्वीसारखे सोपे राहिलेले नाही. कर्मचारी त्यांच्या हक्काचे पैसे आजारपण, लग्न किंवा शिक्षणासाठी काढू शकतात, मात्र आता त्यासाठी कडक अटी घालण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे आहेत:

१. नोकरी सोडल्यानंतर अंतिम सेटलमेंट (Final Settlement): आतापर्यंत नोकरी सोडल्यानंतर २ महिन्यांच्या बेरोजगारीनंतर कर्मचारी पीएफचे पूर्ण पैसे काढू शकत होते. मात्र, नव्या नियमांनुसार, आता नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना तब्बल १२ महिने (१ वर्ष) प्रतीक्षा करावी लागणार आहे.

२. पीएफ अडव्हान्स (PF Advance) बाबतचे नियम: नव्या रचनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यातून अडव्हान्स काढण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी सरकारने एक अट घातली आहे. आता कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यात एकूण जमा रकमेच्या किमान २५ टक्के (Minimum Balance) रक्कम शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे. म्हणजेच, खात्यातील १०० टक्के रक्कम तुम्ही अडव्हान्स म्हणून काढू शकणार नाही.

३. विविध कारणांसाठी पैसे काढण्याची मर्यादा:

  • आजारपण: उपचारासाठी कोणतीही मर्यादा नाही (गरजेनुसार कितीही वेळा काढता येईल).

  • उच्च शिक्षण: नोकरीच्या संपूर्ण काळात जास्तीत जास्त १० वेळा.

  • लग्नकार्य: नोकरीच्या संपूर्ण काळात जास्तीत जास्त ५ वेळा.

  • घर खरेदी किंवा दुरुस्ती: होम लोन किंवा घराच्या संबंधित कामासाठी जास्तीत जास्त ५ वेळा.

  • आणीबाणीची स्थिती: एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २ वेळा.

४. ७५% पर्यंत अडव्हान्सची तरतूद: जर तुमच्या नोकरीला किंवा पीएफ मेंबरशिपला १२ महिने पूर्ण झाले असतील, तर तुम्ही एकूण पीएफ शिल्लक रकमेपैकी (कर्मचाऱ्याचा हिस्सा + कंपनीचा हिस्सा + व्याज) ७५% पर्यंत रक्कम अडव्हान्स म्हणून काढू शकता.

टीप: हे नियम कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी बदलण्यात आले आहेत. तरीही, पैसे काढण्यापूर्वी अधिकृत ईपीएफओ पोर्टलवर अधिक माहिती तपासणे गरजेचे आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *