पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अशांतता दूर करण्यासाठी ‎एकाग्रता हे एक साधन आहे‎

व्यवस्थापनाच्या जगात एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे योग्य की‎एकाच वेळी अनेक कामे करणे चांगले, यावर बरीच चर्चा होते. याकडे‎धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर राम अत्यंत एकाग्र होते, तर श्रीकृष्णाची‎लीला एकाच वेळी अनेक गोष्टी साधणारी होती. आपल्यासाठी यापैकी‎काय योग्य आहे, हे परिस्थितीवर नाही तर आपल्या प्रवृत्तीवर अवलंबून‎असते. कारण नियम असा आहे की, आपल्याला 80०% यश हे 20०%‎प्रयत्नांतून मिळते. आता ते 20% प्रयत्न कोणते असावेत, हे निवडणे खूप‎महत्त्वाचे आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मन नक्की एकाग्र करा.‎एकाग्रता एकदम येत नाही. तुम्ही जेव्हा एकाग्र होण्याचा प्रयत्न कराल,‎तेव्हा अनेक विचार मनावर आक्रमण करतील. अनेक व्यक्तींचे विचार‎मनात डोकावतील. म्हणूनच ज्या सरावाने एकाग्रता येते, त्याला योग‎म्हणतात. व्यवस्थापनाच्या जगात आता हळूहळू योगाचे महत्त्व यामुळेच‎वाढेल. कारण, जसा ‘एआय’चा शिरकाव होईल, तशी लोकांची एकाग्र‎होण्याची प्रवृत्ती नष्ट होईल. ते भौतिकदृष्ट्या यशस्वी तर होतील, पण‎आतून अशांतही असतील. आणि ही अशांतता दूर करण्यासाठी एकाग्रता‎हेदेखील एक साधन आहे.

This post was originally published on this site.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *