पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मिळूनमिसळून राहणे आणि आपलेपणाही देशसेवाच

राजकीय पक्ष देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. सरकारे बदलली, नवीन योजना आकार घेत आहेत. प्रत्येक राज्यप्रमुख दावा करतो की आम्ही सर्वोत्तम काम केले. पण आता राज्यासोबत समाज आणि कुटुंबावरही काम करण्याची वेळ आली. आगामी काळात भारताला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यात आपली खरी ताकद कुटुंब आणि समाज हीच असेल. सुमारे 16-17 वर्षांपूर्वी जगाने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केला होता. देशातील वरिष्ठ नेत्यांनीही संकेत दिले आहेत की कठीण दिवस येऊ शकतात. अशा वेळी कुटुंब आणि समाजाची भूमिका अधिक मजबूत करावी लागेल. समाज, कुटुंबातील बदलाकडे लक्ष द्यावे. ती समस्या म्हणजे एकटेपणा. त्यात सुधारणा केली तरी ती मोठी देशसेवा ठरेल.त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी व शेजाऱ्यांशी जास्तीत जास्त संवाद व आपलेपणा टिकवून ठेवा. आपण इतके केले तरी तीही एक प्रकारची देशसेवा ठरेल.

This post was originally published on this site.



गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मिळूनमिसळून राहणे आणि आपलेपणाही देशसेवाच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *