मुंबई: "देशातील सत्ताधाऱ्यांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजेत. ट्रम्प यांनी धमकी दिल्याने 'ऑपरेशन सिंदूर' थांबवले गेले, पण आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे," अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
निवडणुकीसाठी भाजपचा 'प्लॅन' तयार
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, केंद्राला बंगालमध्ये हिंसाचार पेटलेला हवा आहे, जेणेकरून त्याचे लोण देशभर पसरेल. "ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे की कपट रचून त्यांचा पराभव घडवण्यात आला. १०० जागा लुटल्या गेल्या आणि ९० लाख मते कापली गेली. भाजपला देशभर आग लावायची आहे आणि पुढील दोन वर्षांत अशांतता निर्माण करून लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, हाच त्यांचा प्लॅन आहे," असा दावा राऊत यांनी केला.
राज्यपालांच्या भूमिकेवर कडक टीका
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर बोलताना राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तामिळनाडूमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले जात नाही, यावरून त्यांनी भाजपवर 'कोश्यारी' वृत्तीचे राज्यपाल नेमल्याची टीका केली. पंजाबमधील स्फोटांचा संदर्भ देत त्यांनी भाजप निवडणुकांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही म्हटले.
हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर भाजपचेच नाव नाही
नाशिकच्या काळाराम मंदिरातील कार्यक्रमावरून राऊत यांनी भाजपच्या हिंदुत्वावर सडकून टीका केली. "माजी राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजा फडकवून भाजपने हिंदुत्वावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. भाजपला असे वाटते की जगातील हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर केवळ त्यांचेच नाव आहे. काळाराम मंदिराचा संबंध शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी आहे, या कार्यक्रमाला ठाकरेंना किंवा त्या कुटुंबातील कोणालातरी बोलवायला हवे होते," असे ते म्हणाले.
'हनुमाना'चा अवमान करू नका
अयोध्या आणि नाशिकमधील धार्मिक प्रतिकांच्या वापरावरून राऊत यांनी भाजपला सुनावले. "धर्मध्वजावर हनुमानाचे चित्र लावले जाते, हनुमान निष्ठावान होते पण तुम्ही सर्व 'गद्दार' तुमच्या पक्षात घेतले आहेत. तुमच्या पक्षातील लोक हनुमान आहेत का? आमच्याकडील सर्व हनुमान तुम्ही पळवले आहेत, आता तरी हिंदुत्वाला बदनाम करणे थांबवा," असा टोला त्यांनी लगावला.
कुंभमेळ्याच्या बजेटवरून सवाल
नाशिक कुंभमेळ्यासाठी ३ लाख कोटींचे बजेट असल्याच्या बातम्यांवर राऊत यांनी शंका उपस्थित केली. "इतक्या मोठ्या रकमेचे नक्की काय काम होणार? की केवळ गुजरातच्या ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी हा आकडा फुगवण्यात आला आहे? कुंभमेळा मंत्र्यांनी ३५ हजार कोटींच्या कामांचा हिशोब स्पष्ट करावा," अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




