BJP Wants to Set the Country Ablaze to Win Elections: MP Sanjay Raut Launches Blistering Attack on Central Government

भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला

BJP Wants to Set the Country Ablaze to Win Elections: MP Sanjay Raut Launches Blistering Attack on Central Governmentमुंबई: "देशातील सत्ताधाऱ्यांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजेत. ट्रम्प यांनी धमकी दिल्याने 'ऑपरेशन सिंदूर' थांबवले गेले, पण आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे," अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

निवडणुकीसाठी भाजपचा 'प्लॅन' तयार
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, केंद्राला बंगालमध्ये हिंसाचार पेटलेला हवा आहे, जेणेकरून त्याचे लोण देशभर पसरेल. "ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे की कपट रचून त्यांचा पराभव घडवण्यात आला. १०० जागा लुटल्या गेल्या आणि ९० लाख मते कापली गेली. भाजपला देशभर आग लावायची आहे आणि पुढील दोन वर्षांत अशांतता निर्माण करून लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, हाच त्यांचा प्लॅन आहे," असा दावा राऊत यांनी केला.

राज्यपालांच्या भूमिकेवर कडक टीका
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर बोलताना राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तामिळनाडूमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले जात नाही, यावरून त्यांनी भाजपवर 'कोश्यारी' वृत्तीचे राज्यपाल नेमल्याची टीका केली. पंजाबमधील स्फोटांचा संदर्भ देत त्यांनी भाजप निवडणुकांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही म्हटले.

हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर भाजपचेच नाव नाही
नाशिकच्या काळाराम मंदिरातील कार्यक्रमावरून राऊत यांनी भाजपच्या हिंदुत्वावर सडकून टीका केली. "माजी राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजा फडकवून भाजपने हिंदुत्वावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. भाजपला असे वाटते की जगातील हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर केवळ त्यांचेच नाव आहे. काळाराम मंदिराचा संबंध शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी आहे, या कार्यक्रमाला ठाकरेंना किंवा त्या कुटुंबातील कोणालातरी बोलवायला हवे होते," असे ते म्हणाले.

'हनुमाना'चा अवमान करू नका
अयोध्या आणि नाशिकमधील धार्मिक प्रतिकांच्या वापरावरून राऊत यांनी भाजपला सुनावले. "धर्मध्वजावर हनुमानाचे चित्र लावले जाते, हनुमान निष्ठावान होते पण तुम्ही सर्व 'गद्दार' तुमच्या पक्षात घेतले आहेत. तुमच्या पक्षातील लोक हनुमान आहेत का? आमच्याकडील सर्व हनुमान तुम्ही पळवले आहेत, आता तरी हिंदुत्वाला बदनाम करणे थांबवा," असा टोला त्यांनी लगावला.

कुंभमेळ्याच्या बजेटवरून सवाल
नाशिक कुंभमेळ्यासाठी ३ लाख कोटींचे बजेट असल्याच्या बातम्यांवर राऊत यांनी शंका उपस्थित केली. "इतक्या मोठ्या रकमेचे नक्की काय काम होणार? की केवळ गुजरातच्या ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी हा आकडा फुगवण्यात आला आहे? कुंभमेळा मंत्र्यांनी ३५ हजार कोटींच्या कामांचा हिशोब स्पष्ट करावा," अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



शहर

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *