पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:स्वतः प्रयत्न केल्यावर‎ सत्याची शक्यता वाढते‎

विज्ञानाच्या वादळात मानवता बुजगावण्यासारखी उडून गेली आहे.‎मानवी प्रयत्न करताना आपण सत्याच्या अधिक जवळ असतो. जेव्हा‎तुम्ही स्वतः प्रयत्न करता तेव्हा जीवनात सत्याची शक्यता वाढते, परंतु‎जेव्हा यंत्र पूर्णपणे शिरकाव करते तेव्हा असत्याला प्रवेश करणे सोपे‎जाते. आपल्या देशाची निम्मी लोकसंख्या खोटेपणाच्या विळख्यात आहे.‎अनेक लोक जाणीवपूर्वक खोटे बोलतात, पण त्याहून अधिक लोक‎नकळतपणे खोटे बोलतात. म्हणूनच मानसशास्त्रज्ञ म्हणतात की खोटे‎बोलणे हादेखील एक आजार आहे. खोटे बोलण्यापासून वाचायचे‎असेल तर मानवतेच्या जवळ जा. सत्य, करुणा, अहिंसा, प्रेम,‎आपलेपणा, दुसऱ्यांच्या हिताची कामना- हे सर्व मिळून मानवता बनते.‎शास्त्रांमध्ये आणखी एक गोष्ट लिहिलेली आहे की जेव्हा शब्दांचा‎अतिवापर केला जातो, तेव्हा खोट्याला शब्दांमध्ये प्रवेश करण्याची संधी‎मिळते. जीभ खोटे बोलत नाही, जिभेच्या मागून मन खोटे बोलायला‎लावते. त्यामुळे बोलण्याचा असा सराव करा की प्रत्येक शब्द सत्याला‎स्पर्श करूनच बाहेर पडेल.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *