Pune : खडकवासला धरणावर उभारला जातोय भलामोठा उड्डाणपूल; २७६ खड्डे खणले, कोणत्या गावांना होणार फायदा?

Pune : पुणे खडकवासला धरणावर एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. जो सांगरूण आणि मालखेड या गावांमधील संपर्क सुधारण्यासाठी, मुठा नदीच्या पाणलोट क्षेत्रात बांधला जात आहे. हा सुमारे ३५०मीटर लांबीचा उड्डाणपूल असून, यावर एकूण ८ पदर आहेत. हा उड्डाणपूल पाइल फाउंडेशन तंत्राद्वारे उभारला जात आहे.

या पुलासाठी एकूण २७६ खड्ड्यांची निमिर्ती करण्यात येणार आहे. त्यापैकी १५६ खड्डे जमिनीत आणि १२० खड्डे पाण्यात तयार केले जाणार आहे. आतापर्यंत पाण्यात ५९ खड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहे. स्टील, काँक्रिट आणि लाकडापासून तयार केलेल्या पाइल्सद्वारे या पुलाचे खांब उभे केले जाणार आहेत. अशी माहिती उड्डाणपूलाचे अभियंता रितेश भारद्वाज यांनी दिलीय.

हा उड्डाणपूल ८ पदरी असणार आहे. प्रत्येक खांबामध्ये ४० ते ६० मीटर अंतर ठेवण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात या पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. नवयुगा कंपनीकडून या पुलाचे काम जलदगतीनं सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात अशा प्रकारचा मोठा पूल कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उभारला गेला नाही. रिंग रोडसाठी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या उड्डाणपुलामुळे विरूद्ध दिशेची गावे जोडली जाणार आहे. हा द्रुतगती मार्ग असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना याचा थेट फायदा होणार नाहीय. मात्र, काही वर्षात रिंग रोडने जाणाऱ्या प्रवाशांना धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे विहंगम दृष्य पुलावरून अनुभवता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील वाहतूक सुलभतेच्या दृष्टीनं हा पूल महत्वाचा ठरणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *