Ratnagiri : शिमगोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली

Ratnagiri : कोकणात सध्या शिमगोत्सवासाठी मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत शिमगोत्सवासाठीच मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे निघालेल्या भाविकांच्या बसला मोठा अपघात झाला असून यामध्ये तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

खेड-धामणंद मार्गावर अपघात
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-धामणंद मार्गावरील एनवरे येथे पहाटेच्या सुमारास एका खासगी आराम बसला भीषण अपघात झाला. ही बस रस्त्याच्या कडेला पलटल्याने या बसमधील 25 प्रवासी जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व प्रवासी साखर झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी, 6 मार्च 2026, पहाटे खेड-धामणंद मार्गावर ही भीषण दुर्घटना घडली.

 

रत्नागिरी: कोकणात सध्या शिमगोत्सवासाठी मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत शिमगोत्सवासाठीच मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे निघालेल्या भाविकांच्या बसला मोठा अपघात झाला असून यामध्ये तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

खेड-धामणंद मार्गावर अपघात
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-धामणंद मार्गावरील एनवरे येथे पहाटेच्या सुमारास एका खासगी आराम बसला भीषण अपघात झाला. ही बस रस्त्याच्या कडेला पलटल्याने या बसमधील 25 प्रवासी जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व प्रवासी साखर झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी, 6 मार्च 2026, पहाटे खेड-धामणंद मार्गावर ही भीषण दुर्घटना घडली.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *