राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार; ७२ तासांत २ गुन्हे दाखल झाल्याने आव्हाड नाराज

 राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ३५४ कलमांतर्गत आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले म्हणत आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. तसे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहे. मी लोकशाहीची हत्या झालेली पाहू शकत नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हे दाखल केले. यातील एक गुन्हा हा ३५४ कलमांतर्गत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही,” असे जितेंद्र आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. हाच मुद्दा घेऊन त्यांनी ठाण्यात या चित्रपटाचे शो बंद पाडले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना अटकही करण्यात आली होती. यासोबतच आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मागील साधारण ३ दिवसांमध्ये आव्हाड यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच कारणामुळे ७२ तासांत माझ्यावर दोन खोटे गुन्हे दाखल केले, म्हणत त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे ट्वीटद्वारे जाहीर केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *