
पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) राज्याच्या उत्तरेकडून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र, परतीच्या सुरुवातीने राज्याच्या इतर भागांना मुसळधारांचा तडाखा दिला. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मुंबई परिसरासह कोकण विभाग आणि मराठवाड्यात काही भागांत जोरदार पाऊस झाला. पावसासाठी राज्यात पोषक वातावरण असल्याने मोसमी वारे परतताना राज्यात आणखी काही दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता कायम आहे. पीक हाताशी आलेला शेतकरी त्यामुळे धास्तावला असून, नागरिकही आता पावसाने हैराण झाले आहेत.
राजस्थानमधून २० सप्टेंबरला मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला होता. सध्या उत्तरेकडील बहुतांश भागांत कोरड्या हवामानाची स्थिती आहे. परतीचा प्रवास सुरू झाल्यापासून २४ दिवसांनंतर मोसमी पावसाने महाराष्ट्रातून माघारीला सुरुवात केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि जळगावच्या काही भागांतून मोसमी पाऊस माघारी गेल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन दिवस उशिराने राज्यातून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पाऊस माघारी गेल्याचा भाग वगळून उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा धुमाकूळ कायम आहे. शुक्रवारी पुण्यात हंगामातील सर्वाधिक सुमारे ७५ मिलिमीटर पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील नगर, महाबळेश्वर, सांगली आदी भागांतही मोठ्या पावसाची नोंद झाली. मुंबई परिसरासह कोकण विभागामध्येही पावसाची हजेरी होती. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस परभणी येथे पडला.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या चक्राकार वारे आहेत. ही प्रणाली दक्षिणेकडे येत आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंतही वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. परिणामी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील भागांत पावसाचे प्रमाण अधिक असून, त्याच प्रणालीमुळे राज्याच्या काही भागांत सध्या मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी (१५ ऑक्टोबर) कोकण आणि मध्य महाहराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज कोणत्या जिल्ह्यांत
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर आदी जिल्ह्यांत १६-१७ ऑक्टोबर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतही १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी राहणार आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




