ममतांना धक्का! तपास CBI कडे देण्याचे हायकोर्टाचे आदेश

कोलकाता : पश्चिम बंगालच्या वीरभूम येथे पेट्रोल बॉम्ब टाकून घर जाळण्यात आलं. यामध्ये ८ जणांना जीवंत जाळून हत्या करण्यात आली. या हिंसाचाराच्या तपासाप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. या घटनेचा तपास केंद्राकडे सोपविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

 ममता बॅनर्जी यांच्या सरकारने वीरभूम हिंसाचाराचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. आतापर्यंत या घटनेचा तपास एसआयटी करत होती. मात्र, आज कोलकाता उच्च न्यायालयाने या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिला आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *