Vijay Wadettiwar : भाजपला राज्यात जेमतेम आठ जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही; विजय वडेट्टीवार यांची गॅरंटी!

Vijay Wadettiwar : भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्ही सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  यांनी मोठे विधान केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे करत आरोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या होत्या. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत अनेक मुद्यांवरभाष्य केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा फटका सगळीकडेच बसतोय. कर्नाटक, महाराष्ट्रमध्ये देखील तो दिसून येतोय. त्यामुळे आता भाजपला महाराष्ट्रात जेमतेम आठ जागा मिळतील त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही. अशा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला आहे. 

Nashik News : केक भरवण्याच्या कारणावरून उफाळला वाद, तीन अल्पवयीन मुलांनी काढला मित्राचा काटा

उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार

देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवायचं, हे जनतेने नजरेत ठेवलय. पंतप्रधानांनी बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळेच मनमोहन सिंग यांनी टिप्पणी केली आहे. त्यावरून समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या पदावर आहोत आणि कुठल्या व्यक्तींने कुठल्या स्तरावरील राजकारण करावे, यापेक्षा दुर्दैव या देशाचे कधीच झालं नाही. दहा वर्षे साधू-संतांना विचारल्या गेले नाही, मात्र आता पंतप्रधान मोदी यांना निवडून आणण्यासाठी वाराणसीत साधूच्या बैठका घेतल्या जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार. तर बिहारमध्ये भाजपा साफ झाली आहे. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जेवढं ओरबडता येईल तेवढे ओरबाडून खा अशी स्थितीत सरकार 

सध्या विजय वडेट्टीवार मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागाची  प्रचंड वाईट अवस्था आहे. कुठेही पाण्याचा पत्ता नाही. मराठवाडा विभागात आत्ता साडेसात हजार टँकर सुरू आहे.संभाजीनगर शहरात 750 टँकर सुरु आहे. शेततळे बंधारे आणि विहिरीत पाणी नाही. डाळिंब,लिंबू, संत्री अशी शेती वाळून गेली आहे. असे असले तरीही शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर झाली नाही. केवळ पंचनामा करुन पोट भरत नाही, तर पंचनामा झाल्यावर तात्काळ मदत दिल्यावर पोट भरत असते.

हे टेंडरबाज सरकार जेवढं ओरबडता येईल तेवढे ओरबाडून खा, अशी स्थितीत असल्याची बोचरी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर उद्या उद्या दहा वाजता नागपूर विभागाची बैठक बोलावली असून त्यानंतर आमचा दौरा ठरविण्यात येणार असून शेतकऱ्यांना नवीन कर्ज आणि बियाण्याची सोय करून दिली पाहिजे अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply