Tansa Dam : ठाण्यातील तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

Tansa Dam News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या तानसा धरण पावसामुळे भरून वाहण्याची शक्यता आहे. यामुळेच ठाणे जिल्ह्यात असलेल्या या धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तानसा धरणाची पाणी ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हून जास्त झाली आहे. यामुळेच प्रशासनाने या परिसरातील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Manipur Violence : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर अत्याचार; जमावाने केली निर्घृण हत्या

धरणाखालील व नदीच्या परिसरात कोणती गावे येतात

तानसा धरणाची पाणी ओसंडून वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.  

 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply