Pune : विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार ) यांच्या महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. राज्यात महायुतीच्या २८८ पैकी २३५ जागा विजयी झाल्या आहेत. तर पुणे शहर आणि जिल्ह्याचा विचार करता महायुतीला २१ पैकी १८ जागा जिंकता आल्या आहेत. जनतेने महायुतीला कौल दिल्याने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील सहा महिन्यांच्या आत होण्याची शक्यता आहे.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. काही निवडणुका या तीन वर्षांपासून तर काही निवडणुका दोन ते अडीच वर्षांपासून रखडलेल्या आहेत. इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) आरक्षण आणि प्रभागरचना याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळालेली आहे. त्यातच गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्यात ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले, ते पाहता या निवडणुका यापूर्वी घेण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याचा मोठा फटका राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीला बसला असता, अशी भीती राज्यकर्त्यांच्या मनात असल्याने या निवडणुका लांबत गेल्या आहेत.
|
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने जो विश्वास महायुतीवर दाखवून त्यांना विजयी केले आहे. हे पाहता सध्याचे वातावरण महायुतीसाठी पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फायदा घेत रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा असणार आहे. या माहितीला महायुतीमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. पुढील सहा महिन्यांत या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार होते. निवडणुकीत महायुती अथवा महाविकास आघाडीला कसे यश मिळते, यावर या निवडणुका पुढील वर्षात होणार का? हे देखील ठरणार होते. या निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश पाहता गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका तातडीने घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे.
राज्यातील अनेक महापालिकांच्या प्रभागरचना तसेच जिल्हा परिषद, पंचायती समिती यांच्या गट आणि गणरचना निश्चित झालेल्या आहेत. त्यामुळे आता त्यावर पुढची निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. यासाठी न्यायालयात आवश्यक ती भूमिका मांडून या निवडणुकांवरील स्थगिती उठवावी लागणार आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असल्याने ही स्थगितीदेखील आता लवकरच उठविली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुण्यात होणार नव्याने प्रभाग रचना
पुणे महापालिकेत प्रभागरचना यापूर्वी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेला पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
महायुतीत निवडणूक होणार, की स्वतंत्र लढणार?
महायुतीच्या सरकारला विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत या तीनही पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या असणार आहे. महायुतीमध्ये निवडणूक लढवायची झाल्यास अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीला तोंड द्यावे लागणार आहे. या निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य आणि विजयी उमेदवारांची संख्या लक्षात घेता महापालिकेच्या निवडणुकीत महायुती नक्की टिकणार का? महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
- Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार
- Nagpur Crime : नागपूर हादरले; लग्न मंडपातच हत्या, दुसऱ्या घटनेत किरकोळ वादातून मित्राचा खून
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू