Prithviraj Chavhan: राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री सुट्टीवर जात आहेत. त्यांना दुष्काळाचे गांभीर्यच नाही. नवी लोकसभा गठीत होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता शिथिल न करण्याचा निर्णय विचित्र असल्याचे सांगत दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीवेळी आचारसंहितेची बाधा येत नाही.
मात्र सध्यस्थितीत आचारसंहितेचे कारण सांगून शासन काहीही करत नाही अशी टीका माजी मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राज्य सरकार व मुख्यमंत्र्यावर केली. काँग्रेसच्या आमदाराकडून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे बहुमत येईल असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडी कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक झाली. आमदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, सांगलीचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्हह्यातील सर्व काँग्रेस आमदारांकडून आमदार चव्हाण यांनी प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना ते बोलत होते. (western maharashtra news)
|
दुष्काळ पाणी समितीचे समन्वयक संजय बालगुडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव, कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, आमदारांनी स्थानिक जिल्ह्यातील दुष्काळी भागांना भेट देऊन अहवाल सादर करावा अशी सूचना आमदार चव्हाण यांनी काँग्रेस आमदारांना केली आहे. त्याबरोबर हा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचीही काँग्रेस आमदार भेट घेणार आहे असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. (Congress District President Or. Jadhav, Karad South President Manohar Shinde)
ते म्हणाले, नयी लोकसभा गठीत होइपर्यंत आचारसंहिता शिविलन करण्याचा निर्णय विचित्र आहे. दुकाळ, नैसर्गिक आपत्तीवेळी मावारसंहितेची बाधा येत नाही. मात्र सध्यस्थितीत आचारसंहितेचे कारण आजून शासन काहीही करत नाही. राज्यात दुष्काळी परिस्थिती नसताना मुख्यमंत्री सुट्टीवर जात आहेत त्यांना काळाचे गांभीर्य नाही.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून आचारसंहिता शिथिल करून सामान्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने चारा छावणी, पाणी टँकर बासह दुष्काळी परिस्थितीमधील सुविधांबाबत निर्णय घेत त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने राज्यातील प्रमुख विभागनिहाय दुष्काळी पाहणी समिती स्थापन केल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेस आमदार आपआपल्या जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या पाहणीबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा अशी सूचना आमदारांना केल्या आहेत.
आमदारांकडून हे अहवाल प्राप्त होताच आम्ही सर्व आमदार जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांशी या विषयावर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणार आहोत. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदार आपआपल्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा सादर करणारच आहेत. त्यासोबत दोन दिवसात आपण स्वत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे यासह सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाना भेट देत शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले (Sangli, Kolhapur, Solapur, Pune)
एक्झिट पोलचे जे आकडे आहेत ते चुकीचे ठरतील. 2004 मध्ये ज्याप्रमाणे इंडिया शायनिंग ची जाहिरात करून पुन्हा वाजपेयी सरकार येईल असे एक्झिट पोल ने सांगितले मात्र त्याच्या उलट चित्र झाले त्यामुळे यावेळी ही तशी शक्यता असे सांगुण आमदार चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील असा मला विश्वास आहे.
ईव्हीएम मशीन बाबत लोकांच्या मनात गंभीर शंका आहेत, त्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. लोकांचा विश्वास बसेल असे यंत्रणा निवडणूक आयोगाने तयार करणे गरजेचे आहे. काँग्रेसची बॅलेट पेपरवर मतदान घ्यावी अशी पहिल्यापासून ची मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि देशाचे सरन्यायाधीश अशी समिती कार्यरत होती. मात्र या वर्षाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक वा समितीमधून सरन्यायाधीशांना हटवले आहे. पंतप्रधान व एक मंत्री असल्याने या समितीत विरोधी पक्षनेत्याचे काहीही चालणार नाही हे स्पष्ट आहे. (PrimeMinister Narendra Modi)
त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी निवडणूस आयुक्त नेमण्याची जी नवी पद्धत सुरू केली आहे. त्यात बदल करू आणि सरन्यायाधीशांना पुन्हा या समितीत घेऊ सभी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाणांनी केली.
शहर
- Mumbai : एमएचटी सीईटीच्या पीसीबी गटातील ९६ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्रे, ११ हजार विद्यार्थ्यांनाच अन्य जिल्ह्यांमध्ये केंद्र
- Pune : पक्षकारांना जुने दस्त मिळण्याची सुविधा, सह जिल्हा निबंधक कार्यालयाचा पुढाकार, ७५ हजार दस्तांची यादी
- Pune : पिंपरीत स्कार्पिओ मधून महिलेचं अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद
- Pune : जुन्या राममंदिराला नूतनीकरणाची नवी झळाळी
महाराष्ट्र
- Solapur : माजी सैनिकाचे घर फोडून साडेसात लाखांचा ऐवज लंपास
- Manikrao Kokate : “सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही”, कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांची टीका
- Pune : टँकरच्या फेऱ्यांत वाढ, मार्च महिन्यात ४७ हजार ८९६ फेऱ्या
- Mumbai : माहुलमधील घरे घेता का घरे…पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अल्प प्रतिसाद, नऊ हजार घरांसाठी केवळ १५० अर्ज
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान