Nitish Kumar : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यावेळी भाजप बहुमतापासून थोडक्यात हुकली आहे. या निकालानंतर नितीश कुमार हे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. यातच नितीश कुमार हे बिहारच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार मोठ्या मागण्या केल्या आहेत. यात बिहारला विशेष राज्याचा दर्जा, अधिक मंत्री पदे, राज्याला अधिक निधी आणि बिहारमध्ये लवकर विधानसभा निवडणूक घेण्यात यावी, या मागण्याचा समावेश आहे.
|
सध्या नितीश कुमार बिहारमध्ये मजबूत स्थितीत असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. भाजप, जेडीयू, एलजेपी (आरव्ही) आणि एचएएमने मिळून 30 जागा जिंकल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या जेडीयू नेत्याने सांगितले की, “बिहारमधील मतदारांमध्ये जेडीयू आणि एनडीएसाठी अनुकूल वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सहा महिन्यांत लवकर निवडणुका घेण्याबाबत आम्ही विचार करत आहोत."
दरम्यान, सध्याच्या राज्य विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर 2025 मध्ये संपणार आहे. बिहारमधील शेवटच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये झाल्या होत्या. ज्यामध्ये जेडीयूने 43 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या.
ज्येष्ठ जेडीयू नेते केसी त्यागी यांनी मंगळवारी सांगितले की, पक्ष केंद्राकडून बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी करत आहे आणि ही मागणी पक्ष आता अधिक जोर देऊन करत आहे. कारण आता जेडीयू केंद्र सरकारमध्ये प्रमुख भागीदार आहे. बिहारला विशेष दर्जा मिळावा अशी आमची इच्छा असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा