New Delhi - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त केलेलं नाही. भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या नेत्यांच्या अपेक्षेपेक्षा या जागा खूप कमी आहेत. भाजपच्या जागा कमी होण्यामध्ये उत्तर प्रदेश राज्याचा महत्त्वाचा वाटा राहिला. भाजपला मागील लोकसभेत यूपीमध्ये ६२ जागा मिळाल्या होत्या. पण, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला फक्त ३३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या २९ जागा कमी झाल्याच स्पष्ट आहे.
यूपीसोबत राजस्थानमध्ये देखील भाजपला फटका बसला आहे. या राज्यामध्ये भाजपला क्लिन स्विप मिळत होती. पण, यावेळी त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. भाजपची पिछेहाट झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपच्या जागा नेमक्या कमी कशामुळे झाल्या असा प्रश्न अनेकांना पडत आहे. उत्तर प्रदेशामध्ये राम मंदिराचा मुद्दा ताजा होता. याचा देखील भाजपला फायदा झाला नाही. क्षत्रिय समाज भाजपवर नाराज असल्याचा फटका त्यांना बसल्याचं बोललं जातं.
|
आज तकच्या रिपोर्टनुसार, राम मंदिराचा आंदोलनाचे श्रेय अन्य समूदायांना देण्यात आलं नाही. आंदोलनामध्ये क्षत्रिय समाजाची महत्त्वाची भूमिका होती. पण, त्यांना फारसं महत्व देण्यात आलं नाही. राम मंदिर ट्रस्टमध्ये समाजाच्या एकाही नेत्याला स्थान नसल्याने लोक नाराज होते, असं करणी सेना उत्तर प्रदेश प्रमुख राकेश सिंह रघुवंशी म्हणाले. याशिवाय भाजपच्या काही नेत्यांनी यूपीमध्ये राजपूत राजे आणि इतिहासाबाबत केलेली वक्तव्य त्यांना भोवली आहेत.
क्षत्रिय समाज नाराज असल्याने याचा फटका भाजपला बसल्याचं सांगितलं जातं. उत्तर प्रदेशात भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी केलेले वक्तव्य, क्षत्रिय समाजाच्या इतिहासाबाबत खोटी वक्तव्य, अग्निवीर योजना, ईडब्ल्यूएस योजनेमध्ये सुट देण्यास नकार अशा मुद्द्यामुळे क्षत्रिय समाजात नाराजी होती.
याशिवाय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २१ क्षत्रिय उमेदवारांना संधी देण्यात आली होती. यात ११ जणांचा विजय झाला. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फक्त १० क्षत्रिय उमेदवारांना संधी देण्यात आली होती.
अग्निवीर योजनेचा फटका !
राजनाथ सिंह आणि योदी आदित्यनाथ यांनी पूर्ण जोर लावून देखील यूपीमध्ये पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. अग्निवीर योजना आणि EWS मुद्दा देखील प्रभावी ठरला. अग्निवीर योजनेनुसार तरुणांना काही काळासाठी रोजगार मिळाला, पण त्यांचे भविष्य सुरक्षित झालं नाही. यूपीमध्ये अनेक तरुण लष्करात येण्यासाठी परिश्रम घेत असतात, पण त्यांना केवळ चार वर्षाची सेवा करण्यास सांगण्यात आलं.
दुसरीकडे, EWS ला जमिनीचा संबंध जोडला गेल्याने अनेक राजपूत शेतकन्याची मुल नोकरीपासून दूर राहिले. हे काही मुद्दे भाजपच्या विरोधात गेल्याच सांगितलं जातं. यूपीमधील परभवामुळे योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेचे चित्र देखील वेगळे असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
- Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू