Mumbai Accident : वाऱ्याच्या वेगाने दुचाकी पळवली, नियंत्रण सुटताच तिघांनी गमावला जीव; आरे परिसरातील घटना

Mumbai : मुंबईतल्या आरे जंगलातील बिरसा चौकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. वाऱ्याच्या वेगाने जाणारी दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत दोघांचा घटनास्थळीच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राधेश्याम अशोक दावंडे (वय 34) विवेक लालमन राजभर (वय 24) आणि रितेश शिवाजी साळवे (27 वर्ष) अशी अपघातात (Accident) मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केलाय.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, तिघेही तरुण दुचाकीवरून सुसाट वेगाने जात होते. तिघांपैकी एकाच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते. दरम्यान, आरे जंगलातील बिरसा चौकात त्यांची दुचाकी आली. काळ्याकुट्ट अंधारात चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट विजेच्या खांबाला धडकली.

Mumbai Crime : भयंकर! ७ जणांची हत्या, दोघांचा मृतदेह नाल्यात फेकला; आरोपीच्या दाव्याने पोलिसांची उडाली झोप

अपघात इतका भीषण होता, की परिसरात मोठा आवाज झाला. दुचाकीची खांबाला धडक बसताच तिन्ही तरुण 10 ते 15 फुट हवेत उडाले. यातील 2 तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी एडीआर दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केलाय. 3 तरण्याबांड पोरांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply