Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगात होणार, वांद्रे-कुर्ला-चेंबूरमधील वाहतूक कोंडी कायमची संपणार, पाहा नेमका प्लान

Mumbai  : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत आता आणखी दोन बोगदे होण्याची शक्यता आहे. एक बोगदा हा वांद्रा बुलेट ट्रेन स्थानकापासून ते एअरपोर्टला कनेक्ट केला जाईल. तर दुसरा बोगदा हा चेंबूर ते बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशनला जोडला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. बुलेट ट्रेनसाठी आणखी दोन बोगदे सुरु होण्याची शक्यता आहे.

२०२३ मध्ये राज्य सरकारने ८ सदस्यांची समिती स्थापन केली होती. बोगद्यांचं नेटवर्क तयार करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. यामुळे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील प्रवास हा आणखी सुखकर होणार आहे. पुढच्या ३० वर्षांच्या दृष्टीने हे बोगदे तयार केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या वांद्रे रिक्लेमेशन येथे वाहतूक कोंडीची समस्या आहे. एसव्ही रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि बीकेसी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या जास्त आहे. याचसोबत सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, केसी चुनाभट्टी कनेक्टर, ईस्टर्न एक्सप्रेस वेवरदेखील वाहतूक कोडींची समस्या आहेत. त्यामुळेच हा नवीन उपक्रम सरकार हाती घेण्याची शक्यता आहे,

नवीन बोगद्यांमुळे फायदा

या दोन नवीन बोगद्यांमुळे तुम्ही थेट फ्रिवेला बाहेर निघणार आहे. फ्रिवे हा अतल सेतूला जोडला गेला आहे.यामुळे प्रवाशांना थेट वर्सोवा-वांद्रा सी लिंक आणि वर्सोवा दहिसर कोस्टल रोडला कनेक्ट होता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. याचसोबत सुखकर प्रवास होणार आहे. यामुळे ईस्ट-वेस्ट कोरिडॉर जोडले जाणार आहे. प्रवाशांना फ्रिवे, अटल सेतू या मार्गावर जलद पोहचता होणार आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *