Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी! देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजप आक्रमक

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मराठा समाज आणि मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांनंतर भाजप देखील आक्रमक झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नौटंकी आता बंद करावी, अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील समाजाच्या नावाखाली स्वतःची राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे, हे त्यांनी सांगावे. मनोज जरांगेंच्यापाठी सिल्वर ओक आहे की जालन्यातील भैय्या फॅमिली आहे. हे खरं आता लोकांसमोर यायला लागले आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील आक्रमक; 'सागर' बंगल्यावर जायला निघाले; अंतरवाली सराटीत गोंधळ,

तुम्हाला दहावेळा सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊ नका. देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजावर अनेक उपकार आहेत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं आहे. त्या फडणवीसांचं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय हे लोकांच्या लक्षात आलं आहे, असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळी संपली, त्यामुळे तुमचं दुख लक्षात येत आहे. मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समााला आरक्षणं दिलं आहे. त्यामुळे मराठा समाज खुश आहे. तुमच्या सल्ल्याची आता समाजाला गरज नाही, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *