Maharashtra Politics : "संजय राऊतांमुळेच अजित पवार महाविकास आघाडीला सोडून जातील"

Maharashtra Political News : "संजय राऊत आणि अजित पवार यांचे शाब्दिक खटके उडत असल्याने महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक होत आहे, शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून बाहेर पडले. आणि आता अजित पवारही महाविकास आघाडीला संजय राऊत यांच्यामुळेच सोडून जातील", असा खळबळजनक दावा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार अशाही उलट सुलट चर्चा सुरू आहे. या चर्चांवर अजित पवारांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मी राष्ट्रवादी कुठेही जाणार नाही, असं पवारांनी म्हटलं आहे.

संजय राऊत अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पक्षाची बाजू मांडण्यावरून वाद झाला आहे. राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्या सारखं बोलू नये. त्यांनी आमचं वकीलपत्र घेऊ नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

तर शिवसेना फुटली होती तेव्हा तुम्ही आमचं वकीलपत्र का घेतलं होतं? असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आज तर अजित पवार यांनी कोण संजय राऊत? असा सवालच भर पत्रकार परिषदेत विचारला आहे. त्यामुळे अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे अधिकच दिसत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *