Jalgaon Accident News: पहाटेचा थरार..बसने उतरले अन्‌ पाय गमावले; चौकात उभ्‍या चौघांना पिकअपने उडविले

पाचोरा (जळगाव) : पाचोरा येथील महाराणा प्रताप चौकात पहाटेच्‍या सुमारास मुंबईकडुन येणाऱ्या पिकअप गाडीने मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिली. या अपघातात चौघे  जखमी झाले आहेत. यात दोन जणांच्‍या दोन्‍ही पायांचे तुकडे पडले आहेत.

मुंबईहून बुलढाणा येथे सफरचंद, किवी, मोसंबीने भरलेली पिकअप मालवाहतूक गाडीने आज (१२ मे) पहाटे साडेपाचच्या सुमारास  मुंबईकडुन येत असतांना चौकातील दत्त मंदीराच्या ओट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ओट्यावर बसलेल्या दोघांच्या चारही पायाचे तुकडे होवुन जागीच पडले. अपघातानंतर एकच हाहाकार उडाला. यानंतर जखमींना उपचारासाठी हॉस्‍पीटलमध्‍ये भरती करण्यात आले. या अपघातात विनोद बारकु पाटील (वय ३५), कुंदन सुनिलसिंग परदेशी (वय १७, रा. पुनगाव), अमोल वाघ (वय २६, रा. पाचोरा), वसंत भाईदास पाटील (वय ४२) हे जखमी झाले आहेत. यात विनोद पाटील व वसंत पाटील यांचे दोघांच्‍या पायाचे जागेवर तुकडे पडले होते.

दरम्यान वसंत पाटील हे आज सकाळीच लक्झरीने पाचोरा येथे आले होते. चौकात उतरले आणि चहा घेतल्यावर पत्ता विचारत अमोल वाघ यास उठून स्वतः नातेवाईकांची वाट बघत उभे होते. याचवेळी अचानक गाडीने धडक दिल्‍याने त्यांचे दोघे पाय उडवले. तसेच अपघातात जखमी विनोद पाटील हा घरातील कर्ता पुरुष आहे. त्याचेही दोघे पाय निकामी झाले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply