Jharkhand : झारखंडच्या चक्रधरपूरजवळ रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. हावडा येथून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनचे डबे रुळावरून खाली घसरले आहेत. या अपघातात आतापर्यंत ६ प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज मंगळवारी पहाटेच्या साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. रेल्वे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
अपघातग्रस्त ट्रेनमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सध्या स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. घटनास्थळी प्रवाशांचा आरडाओरडा सुरू आहे. आतापर्यंत अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
|
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, हावडा येथून मुंबईच्या दिशेने ही एक्स्प्रेस येत होती. मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ट्रेन झारखंडच्या टाटानगर परिसरात आली. त्याचवेळी अचानक एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले.
अपघात इतका भीषण होता, ट्रेनचे डबे जवळच उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या वृत्ताला रेल्वे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात येत आहे.
रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. या अपघाताची काही फोटो देखील समोर आले आहेत. दरम्यान, अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वास्तविक, ज्या ट्रॅकवरून एक्स्प्रेस जात होती त्याच्या शेजारी एक मालगाडी उभी होती. बोगी रुळावरून घसरली आणि मालगाडीला धडकली, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. टाटानगर 06572290324, चक्रधरपूर 06587 238072, राउरकेला 06612501072, 06612500244 आणि हावडा येथील प्रवाशांनी मदतीसाठी 9433357920, 03232673 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं