Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळाचा फटका हवाई प्रवाशांना! पुणे–मुंबई तिकीट दर चक्क 1 लाखांच्या घरात; इतर मार्गांवरही जबरदस्त वाढ

Pune : इंडिगो एअरलाईन्सच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा थेट परिणाम देशभरातील हवाई प्रवासावर झाला आहे. याचा गैरफायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. प्रवाशांची वाढलेली मागणी आणि मर्यादित उड्डाणांमुळे अनेक मार्गांवरील भाडे गगनाला भिडले आहेत.

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या पुणे-मुंबई या एकाच उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे, नागपूर-मुंबई या मार्गावरील विमानांसाठी देखील ३० हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे समोर आलं आहे. पुणे-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गांवरील दरही याच दरम्यान ३० हजार रुपयांच्या वर गेले आहेत.

Pune : वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पोलिसाची सुसाईड नोट; “माझा नाईलाज आहे…” — नेमकी ही घटना काय?

गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले असून, पुणे विमानतळाला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची एकूण ४६ उड्डाणे रद्द झाली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळूरू, रांची यांसारख्या शहरांतून पुणे येथे येणाऱ्या २३ आणि पुण्याहून बाहेरील राज्यांमध्ये जाणाऱ्या २३ उड्डाणांचा समावेश होता. अनेक उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

विविध प्रवास संकेतस्थळांच्या आढाव्यातून हे स्पष्ट झालं आहे की, इंडिगोच्या विमानांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे इतर कंपन्यांनी मिळणाऱ्या संधीचा फायदा घेत तिकीट दरात ही प्रचंड वाढ केली आहे. ज्यामुळे सामान्य प्रवाशांचे मोठे आर्थिक शोषण होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *