Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ परिसरात सत्संगाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झालेत. या चेंगराचेंगरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदी उत्तर देत होते. यावेळी त्यांना हाथरस चेंगराचेंगरीची बातमी मिळाली.
त्यावेळी पंतप्रधान मोदी लोकसभेतील भाषण करत होते. घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी यांनी आपले भाषण थांबवत चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला. तर जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो असं मोदी म्हणाले.
|
सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्यानंतर तेथे मृतदेहांचे ढीग पडले होते. एकावर एक अशा मृतदेह त्या ठिकाणी पडले होते. या सोहळ्यात २० ते ५० हजार लोक आले होते. दरम्यान या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होईल, अशी शक्यता स्थानिक गुन्हे शाखेने वर्तवली होती. सत्संगात झालेली प्रचंड गर्दी पाहून LIU ने अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात काही मोठी घटना घडण्याची भीती व्यक्त केली होती.
मात्र त्यानंतरही अधिकारी गप्प बसले आणि आज चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १०७ भाविकांना प्राण गमवावे लागले. अपघातानंतर अधिकारी सतर्क झाले आणि ते घटनास्थळी रवाना झाले. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी यांनी अधिकाऱ्यांकडून अहवालही मागवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलीय.
सिकंदराराऊ कोतवाली परिसरातील फुलराई गावात भोले बाबा साकार हरी यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रशासनाला या सत्संगाच्या आयोजनाची माहिती असली तरी सत्संगाला येणाऱ्या भाविकांची संख्या कमी असणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र १.२५ लाखांहून अधिक भाविक सत्संगाला पोहोचले. सत्संगाला उपस्थित असलेल्या भाविकांची संख्या पाहून LIU ला काही मोठ्या घटनेचा संशय आला.
त्यांनी अहवाल तयार करून तो अधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. मंडपात उकाडा जाणवत असल्याने भाविकांचा श्वास गुदमरू लागला. त्यामुळे तीन तास चाललेल्या या सत्संगात अनेक भाविक बेशुद्ध पडले. सत्संग संपताच भाविक बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यात चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत महिला आणि लहान मुलांसह अनेक लोक दबले गेले. या दुर्घटनेत १०७ भाविकांचा चिरडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर नेत्यांनी शोक व्यक्त केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु: ख व्यक्त केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त केलाय. लोकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलें. राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेत महिला आणि मुलांसह अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे. ज्यांनी त्यांचे कुटुंबीय गमावले त्यांच्याबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करते, ” असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केलाय. 'उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्यात. जखमी लोकांची तब्येत लवकरात लवकर बरे होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय. सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे की जखमींवर शक्य ते सर्व उपचार करावेत आणि पीडित कुटुंबांना मदत करावी. भारतातील सर्व कामगारांना विनंती आहे की त्यांनी मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करावे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
- Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू