मुंबई : ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत गेलेले चालतात. लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर माथे टेकवले किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफांच्या वाढदिवसाला जाऊन केक कापला, त्यात भाजपला काही वावगे वाटत नाही. पण, आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली तर हिंदूत्व सोडले, अशी आवई उठवली जाते. याच न्यायाने भागवत मशिदीत गेले म्हणजे भाजप-संघ परिवाराने हिंदूत्व सोडले असे मानायचे का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला. हिंदूत्वाबाबत तडजोड नसल्याचे स्पष्ट करत ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला लक्ष्य केले.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. ‘‘काँग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून आम्ही हिंदूत्व सोडले, अशी टीका भाजपकडून केली जाते. पण, शिवसेनेने कधीही हिंदूत्व सोडलेले नाही, याचा पुनरुच्चार करताना ठाकरे यांनी भाजपच्या हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘आमचे हिंदूत्व देशाशी जोडलेले आहे, तुमचे हिंदूत्व हे शेंडी- जानव्याशी जोडलेले आहे. नुसती जपमाळ करून कोणी हिंदू होत नाही. भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. त्यावेळी हिंदूत्व कुठे गेले होते, असा सवाल करीत देशप्रेमी मुस्लीम किंवा अन्य धर्मीय हे आमच्यासाठी हिंदूच आहेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यात फडणवीस सरकार असताना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव केले नव्हते. ते आमच्या सरकारने केले आणि त्यावेळी शिवसेनेच्या प्रस्तावास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तात्काळ पाठिंबा दिला होता, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे संवाद साधण्यासाठी मशिदीत गेले होते, असे सांगण्यात येते. भागवत हे राष्ट्रपिता असल्याचे मत उपस्थित मुस्लिमांनी केले. आम्ही तर भागवत यांना राष्ट्रपती करा, अशी आधीच मागणी केली होती. भागवत यांनी नागपूरच्या मेळाव्यात महिला-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणाचा उल्लेख केला. पण, गुजरातमध्ये बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींची सुटका झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला आणि उत्तराखंडमध्ये भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये एका तरुणीची हत्या होते, हीच का भाजपची महिला शक्ती का, असा खोचक सवालही ठाकरे यांनी केला. बेरोजगारी, विषमता यावरून रा. स्व. संघाचे दत्तात्रय होसबाळे यांनी केलेल्या विधानांबाबत त्यांचे अभिनंदनच करावे लागेल. होसबाळे सत्यच बोलले. त्यांनी मोदी आणि भाजप सरकारला आरसा दाखवला आहे. होसबाळे यांच्या विधानानंतर काही तरी सुधारणा होईल ही अपेक्षा आहे, असेही ठाकरे म्हणाले. महागाईत सामान्य जनता होरपळली असताना भाजप नेते मुद्दाम गाईचा विषय सारखा-सारखा उकरून काढतात, असा आरोपही त्यांनी केला.
फडणवीस यांच्यावरही टीका
कायदा पाळून भाषण न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याचा त्यावर ठाकरे म्हणाले, कायदा आम्हालाही कळतो. एक आमदार मिरवणुकीत गोळीबार करतो, दुसरा हातपाय तोडण्याची भाषा करतो. नवी मुंबईत पोलीस अधिकारी शिवसेना कार्यकर्त्यांना धमक्या देतात, अन्य काही ठिकाणीही तडीपारी व अन्य प्रकार सुरू आहेत. ‘मिंधें’साठी कायदा नाही का? आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरे पाळणार का? कायद्याचा एकतर्फी वापर आणि अन्याय सहन करणार नाही. मी सांगितल्याने शिवसेना कार्यकर्ते आज शांत आहेत, त्यांना भडकण्यास भाग पाडू नका. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. मी पुन्हा येईन म्हणाले होते. परत आले, पण दीड दिवसात पदावरून गेले. शेवटी ते उपमुख्यमंत्री झाले, अशी बोचरी टीका ठाकरे यांनी केली.
खोकासूर भस्मसात
आता शिवसेनेचा वणवा पेटेल आणि त्यात गद्दारीचा रावण, खोकासूर भस्मसात होईल, असा हल्लाही त्यांनी चढविला. ज्यांना आमदार, खासदार, मंत्री केले, त्यांनी गद्दारी केली. पण ज्यांना काही दिले नाही, ते एकनिष्ठ आज माझ्याबरोबर आहेत, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. यांची हाव संपतच नाही, त्यामुळे शिवसेना काबीज करून धनुष्यबाण चिन्ह हवे आहे, पक्षप्रमुख व्हायचे आहे. एकनिष्ठ शिवसेना कार्यकर्त्यांने सांगितले, तर मी पक्षप्रमुखपद लगेच सोडेन, पण गद्दारांनी सांगून कदापिही नाही. बांडगुळे छाटली गेली, हे बरेच झाले. वृक्षांची मुळे जमिनीत असतात, बांडगुळांना स्वत: ची ओळख नसते. स्वत:च्या वडिलांच्या नावाने मते मागता येत नाहीत, त्यामुळे बाप चोरणारी ही औलाद आहे. मी रुग्णालयात निपचीत पडून असताना पुन्हा उठू नये, यासाठी गद्दारांची कटकारस्थाने सुरू होती, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
अडीच वर्षे सरकार चालवताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगली साथ दिली व मानसन्मान दिला. उलट भाजपच्या सरकारमध्ये असताना ते ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना जाऊन भेटले होते, हे चव्हाण यांनी नुकतेच उघड केले आहे. तसेच मी बोलत असताना अजितदादांनी कधी लुडबूड केली नाही, असा टोलाही ठाकरे यांनी शिंदे यांना लगावला.
ईडीचे कार्यालय दिसताच गद्दारांचे हिंदूत्व घुमू लागते व त्यासाठी शिवसेना सोडल्याचे ते सांगत आहेत. धर्मवीर आनंद दिघे हे एकनिष्ठ शिवसेना नेते होते. त्यांची आठवण शिंदे यांना २० वर्षांत झाली नाही. आता त्यांचे नाव राजकारण करण्यासाठी घेतले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
हुकूमशाहीचा धोका
देशात कोणतेही पक्ष शिल्लक राहणार नाहीत, शिवसेना संपली आहे, अशी वक्तव्ये भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहेत. देशात हुकूमशाही येण्याचा धोका असून, त्याविरोधात एकजूट दाखविण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
अमित शहा ‘घरगुती मंत्री’
अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे ‘घरगुती मंत्री’ आहेत, असा सवाल ठाकरे यांनी केला. ते वेगवेगळय़ा राज्यात जाऊन सरकारे पाडत आहेत, पक्ष फोडत आहेत. शिवसेनेला जमीन दाखवा, असे सांगत आहेत. त्यांनी गद्दारांच्या पालखीतून मिरविण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरची एक इंचभरही जमीन मिळवून दाखवावी, आम्ही त्यांचे कौतुक करू, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
‘दिवाळी भेट निविदेची चौकशी करा’ राज्य सरकारने दिवाळीनिमित्त तेल, साखर, मैदा शिधापत्रिकाधारकांना देण्यासाठी ५१३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत एक ऑक्टोबरला निविदा काढली, दुसऱ्या दिवशी सुटी आणि तीन तारखेला निविदा मंजूर केली. हे संशयास्पद असून या निविदांची चौकशी करावी व कंत्राट रद्द करावे. शिधापत्रिकाधारकांना थेट खात्यात रक्कम जमा करावी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
‘पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री’
शिवसेनेतील बंड हे तोतयांचे बंड असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. बंडखोर अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसैनिकांची अशीच साथ लाभली तर भविष्यात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर