Assam Accident News : पिकनिकला जाताना काळाने गाठलं; बस आणि ट्रकमधील भीषण अपघात १२ जणांचा मृत्यू, २५ जखमी

Assam Accident News : आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकाची स्थिती नाजूक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचा धोका वर्तवला जात आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसाक गोलाघाट जिल्ह्यातील देरगाव परिसरात हा अपघात झाला आहे.

Lok Sabha Election : संक्रातीला महायुतीच्या प्रचाराचा नारळ, लोकसभेला 45, विधानसभेला 225 प्लस टार्गेट, कोण किती जागा लढणार?

बसमध्ये ४५ जण प्रवास करत होते. सर्वजण पिकसाठी निघाले होते. मात्र पहाटे ५ वाजेच्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती, बसचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply