Amravati News : मुंबईत मंत्रालयाला घेराव करण्यासाठी निघालेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलीसांनी अमरावतीत अडवले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी काल रात्री 10 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी तुकडोजी महाराज मंदिरात रात्र काढली. विशेष म्हणजे, मुंबईत जाण्यापासून रोखण्यात आल्याने मोर्शी येथील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्त आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्यासाठी निघाले आहेत. तर दुसरीकडे अमरावती पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणात परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या. यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना मोबदला आणि शासकीय नोकऱ्या देण्यात आल्या नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर, आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आपण मुंबईत धडक देऊन मंत्रालयाला घेरावा घालणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु, पोलिसांनी शेतकऱ्यांना अमरावतीतच अडवले आहे. त्यामुळे शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून आता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
Ravindra Waikar Case : ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड, सकाळपासून झाडाझडती |
आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले...
दरम्यान, शेतकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रकल्पग्रस्त आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व गेटवर पोलीस तैनात असल्याचे चित्र आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ देणार नाही अशी भूमिका पोलिसांची आहे. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते...
विशेष आपल्या मागण्यासाठी याच आंदोलक शेतकऱ्यांनी यापूर्वी मुंबई मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते. त्याच्या या आंदोलनामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती. अक्षरशः पोलिसांना स्वतः मंत्रालयाच्या जाळ्यावर उतरून आंदोलकांना ताब्यात घ्यावे लागले होते. दरम्यान, आता पुन्हा शेतकऱ्यांनी मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा दिल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी या आंदोलकांना मुंबईला जाण्यापासून रोखले आहेत.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मागच्यावेळी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केल्याची घटना लक्षात घेता अमरावती पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वच गेटवर पोलीस तैनात असून, अधिकारी आणि कर्मचारी यांचे ओळखपत्र पाहून त्यांना आतमध्ये सोडले जात आहे. तसेच, आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू